शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

Corona Vaccine : रात्री ८.३० वाजता लस नोंदणी, पाच सेकंदात हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:11 IST

Corona Vaccine: ज्या नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे, त्यांनाच लस देण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांना लस नोंदणीसाठी प्रचंड त्रासएका केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्याची सोय नाही.

औरंगाबाद : केंद्र शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस घेण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक केली आहे. कोविन ॲपवर ही नोंदणी करावी लागते. औरंगाबाद शहरात दररोज रात्री ८.३० वाजता ॲप नोंदणीसाठी उघडण्यात येते. अवघ्या पाच सेकंदात एका केंद्रावर तब्बल २०० नागरिकांचे बुकिंग होते. अवघ्या पाच ते दहा मिनिटांचे अंतर ठेवून दुसऱ्या केंद्राची नोंदणी सुरू होते. एकूण सहा केंद्रांवर नोंदणी करण्यात येते. काही मिनिटात संपणाऱ्या या प्रक्रियेमुळे हजारो नागरिक नोंदणी करण्यापासून वंचित राहात आहेत.

केंद्र शासनाने १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याची घोषणा केली. महाराष्ट्र शासनाने अत्यंत कमी प्रमाणात का होईना कोव्हॅक्सिन लस देण्यास सुरुवात केली. औरंगाबाद शहरात यासाठी ६ केंद्र उघडली आहेत. सकाळी १० ते ४ या वेळेत लसीकरण करण्यात येते. ज्या नागरिकांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे, त्यांनाच लस देण्यात येत आहे. एका केंद्रावर दोनशेपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्याची सोय नाही. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनी केंद्रावर अजिबात येऊ नये, असे सांगितलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या केंद्रावरच लसीकरण करावे लागते. महापालिकेला स्वतःच्या मर्जीने केंद्र वाढवता येत नाही. ॲपशिवाय जास्त नागरिकांना लस देता येत नाही.

८.३० वाजता ऑनलाईनची प्रक्रिया सुरूदररोज रात्री ८.३० वाजता हजारो नागरिक नोंदणीसाठी प्रयत्न करतात. अवघ्या पाच सेकंदात ॲपवरील २०० जणांची नोंदणी संपते. इतर पाच केंद्रांवर थोड्या थोड्या अंतराने ॲप सुरू करण्यात येते. मात्र, तेथेही अशीच परिस्थिती असते. नोंदणी होत नसल्यामुळे हजारो नागरिक दररोज रात्री नोंदणीचा प्रयत्न करतात. पण, त्यांना यश येत नाही. नेहमी ॲपवर नोंदणी करणाऱ्यांना ही प्रक्रिया सोपी जात आहे.

एक आठवड्यापासून प्रयत्न करतोयकोविन ॲपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ ते दहा दिवसांपासून दररोज रात्री प्रयत्न करीत आहे. अवघ्या काही सेकंदात केंद्रावर नोंदणी पूर्ण झालेली असते. दररोज प्रयत्न केल्यानंतरही यश मिळायला तयार नाही. शासनाने नोंदणी करण्यासाठी किमान वेळ तरी वाढवून द्यावा. अशा पद्धतीने नोंदणी होत राहिल्यास असंख्य नागरिकांना वर्षानुवर्षे लसच मिळणार नाही. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना किमान ८ दिवस, १० दिवसानंतरची वेळ तरी दिली पाहिजे.- राजू तुपे, हर्सूल

शासनाला त्रासाची जाणीव नाही १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक नागरिकाकडे अँड्रॉईड फोन असेलच असे नाही. ज्यांच्याकडे आहे त्याच्यातील अनेकांना नोंदणी कशी करावी, हेच माहीत नाही. त्यामुळे लस मिळावी म्हणून असंख्य नागरिक त्रस्त आहेत. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीव शासनाला नाही. हजारो नागरिक लस घेण्यासाठी तयार असतानाही किचकट प्रक्रियेतून वेळ काढण्याचे धोरण स्वीकारले जात आहे.- अमेय दिवाकर देशमुख, एन-८

लस उपलब्ध करून द्यावी ४५ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ज्या पद्धतीने केंद्रावर बोलावून लसीकरण करण्यात येत आहे, त्याच पद्धतीने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना टप्प्याटप्प्यात बोलावून किंवा टोकन पद्धतीने लसीकरण करायला हरकत नाही. दिवसभरातून सहाशे लसीकरण करण्यापेक्षा सहा हजार तरी संख्या ठेवावी. शहराची जेवढी गरज आहे, तेवढी लस शासनाने दिली पाहिजे.- सागर पाले, हडको.

शासन नियमानुसारच लसीकरणलसीकरणासाठी शासनाने नियमावली ठरवून दिलेली आहे. या नियमावलीच्या बाहेर महापालिकेला जाता येत नाही. कोविन ॲप केंद्र शासनाने तयार केलेले आहे. लसीचा साठा प्राप्त झाल्यानंतर ४५ वरील नागरिकांना केंद्रावर बोलावून लस देण्यात येत आहे. २ लाख ६६ हजार नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. शासनाकडून लसीकरणात जसजसे बदल करण्यात येतील, तशी अंमलबजावणी आमच्याकडून होते.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या