शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

corona vaccine : लस तुटवड्याने औरंगाबादेत लसीकरण बंद; ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 11:46 IST

corona vaccination stopped in Aurangabad : रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या.

ठळक मुद्दे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.

औरंगाबाद : केंद्र शासनाकडून लसींचा पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. दुसरा डोस ८४ दिवसांनंतर घ्या, असे शासनानेच जाहीर केले. १०० दिवस उलटल्यानंतरही अनेकांना लस मिळेना. एकीकडे मोफत लसींचा प्रचंड तुटवडा असताना शहरातील खाजगी रुग्णालयांना पाहिजे तेवढ्या लसी विविध कंपन्या उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिक भर पडत आहे. ( Large shortage of corona vaccine in Aurangabad ) 

शहरात लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस वापरली जाते. रविवारी एका केंद्रावर कोविशिल्डच्या ४०० लसी अवघ्या एका तासात संपल्या. त्यासोबतच कोव्हॅक्सिनच्यादेखील दीडशे लसी शिल्लक असून, तीही संपल्यात जमा आहे. शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात आल्या. शनिवारी ३९ केंद्रांवर अवघ्या काही तासातच लस संपल्या. ७ हजार नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्यात आला. ७०० पेक्षा अधिक नागरिकांना पहिला डोस दिला. 

डोस न घेताच माघारी फिरावे लागलेया आठवड्यांत चार दिवसानंतर महापालिकेला ८ हजार लस मिळाल्याने शनिवारी ३९ केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्याकरिता ३४ केंद्रांवर व्यवस्था केली. लस आल्याचे कळताच सकाळपासूनच केंद्रावर कुपन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. कुपन घेतल्यानंतरही काही नागरिक थेट केंद्रावर लस घेण्यासाठी दाखल झाले. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक केंद्रावर १५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. दिवसभरात साडेसहा हजार नागरिकाचे लसीकरण झाले. अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.

५५ हजार नागरिक डोसच्या प्रतीक्षेत१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ८ ते १० हजारच लस मिळत आहे. एकदा साठा मिळाल्यानंतर किमान चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागते. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या ५५ हजारहून अधिक नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद