शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

corona vaccine : कोरोना लसींचा स्टॉक संपला तर मोहीम बंद पडते, १ मेनंतर काय होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 18:11 IST

सध्याच महापालिकेच्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभर लांबलचक रांगा लागत आहेत. वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देमागील तीन महिन्यांत महापालिकेने दोन लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात लसीकरण मोहीम फक्त औरंगाबाद महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधासाठी लसीशिवाय पर्याय नाही, हे आता लोकांनाही कळून चुकले आहे. प्रारंभी लस घेण्यासाठी घाबरणाऱ्या नागरिकांनी आता लसीकरण केंद्रासमोर रांगा लावायला सुरुवात केली आहे. मागणी जास्त आणि शासनाकडून लसीचा पुरवठा कमी होत आहे. चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम राबवून बंद करावी लागते. १ मेनंतर परिस्थिती आणखी विदारक होण्याची शक्यता आहे.

शहरात सध्या ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यात येत आहे. १ मेनंतर १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच महापालिकेच्या प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसभर लांबलचक रांगा लागत आहेत. वाढलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेकडील लस साठा शनिवारी संपला होता. राज्य शासनाने रविवारी रात्री महापालिकेला फक्त २५ हजार डोस उपलब्ध करून दिले. सोमवारी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. गुरुवारी किंवा शुक्रवारपर्यंत पुरेल एवढाच साठा आहे. त्यानंतर पुन्हा लसीकरण मोहीम बंद करून नवीन साठा येण्याची वाट बघावी लागेल. तीन महिन्यांपासून असाच खेळ सुरू आहे.

१ मेनंतरचे नियोजनशहरी भागात १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांची संख्या जवळपास तीन ते चार लाख असण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ पेक्षा पुढील प्रत्येक नागरिकाला लस देताना अनेक ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी टाळण्यासाठी महापालिकेला लसीकरण केंद्रे वाढवावी लागतील. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

१० टक्के नागरिकांना दिली लसशहराची लोकसंख्या सध्या सोळा ते सतरा लाख गृहीत धरण्यात येते. मागील तीन महिन्यांत महापालिकेने दोन लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली आहे. १० टक्के नागरिकांना आतापर्यंत लस मिळाली आहे. शहरातील प्रत्येक वाॅर्डात लसीकरण मोहीम फक्त औरंगाबाद महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. असा उपक्रम इतर ठिकाणी नाही. सध्या शहरात लसीची प्रचंड मागणी वाढली आहे. जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा शासनाकडून होत नाही. त्यामुळे लसीकरण मोहिमेला अधूनमधून ब्रेक द्यावा लागत आहे.

अशी आहे आकडेवारी : १४६ लसीकरण केंद्र सुरू, १४६ लसीकरण केंद्र शहरात७,००० नागरिकांना दररोज लस, १०,००० नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद