शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना इफेक्ट : मसाल्याची मागणी अन् कोरोनाच्या भीतीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:13 IST

आता जसजशी अनलॉक प्रक्रिया सुरू झाली, तसतशी लोकांच्या मनातून कोरोनाची भीतीही कमी होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आता काढ्याचे नियमित सेवनही थांबविले आहे. 

ठळक मुद्देसध्या पावसाळा असूनही या पदार्थांच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येते. हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, मिरे, ओवा यांची चारपटीने मागणी वाढली होती

औरंगाबाद : मार्च महिन्याच्या मध्यावर कोरोना भारतात अवतरला आणि त्यानंतर कोरोनाच्या भीतीमुळे कडाक्याचा उन्हाळा असूनही उष्ण पदार्थांची मागणी तीव्रतेने वाढत गेली. आता मात्र कोरोनाच्या भीतीमध्ये जसजशी घट होत आहे, तसतशी घट आता उष्ण पदार्थांच्या मागणीतही होताना दिसते आहे.

कोरोनाचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे सर्दी आणि खोकला. सर्दी, खोकला होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण सतर्क होता. परिणामी उष्ण पदार्थ सेवन करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत गेली. अशातच आयुष मंत्रालयातर्फे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा कसा करायचा, हे सांगण्यात आले. त्यानुसार बहुतांश लोकांनी हळद,  सुंठ, काळे मिरे, ओवा, दालचिनी, लवंग या पदार्थांपासून काढा तयार केला आणि त्याचे नियमित सेवन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐन उन्हाळा असतानाही या पदार्थांच्या मागणीत चारपट वाढ  झाली  होती, असे मोंढ्यातील व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले.

एरवी उन्हाळा असताना उष्ण पदार्थांची मागणी घटत जाते आणि थंड पदार्थांची मागणी वाढत जाते, परंतु यावर्षीच्या उन्हाळ्यात मात्र कोरोनाच्या भीतीमुळे पूर्णपणे विरुद्ध चित्र दिसून आले. अनेक घरांमध्ये तर सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याआधीच या पदार्थांपासून केलेला काढा सेवन केला जायचा.  काही  घरांमधील महिलांनी तर एकेक किलो काढा तयार करून ठेवला होता. यासोबतच लसूण, अद्रक यांची मागणीही वाढली. व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत असणारे लिंबू आणि पपई यांनाही चांगलीच मागणी होती. तसेच आवळ्याच्या पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ होते. काढ्यासोबत अनेक जण मध आणि गूळ हे उष्ण पदार्थही सेवन करायचे. त्यामुळे दालचिनी, हळद,  सुंठ,  लवंग, मिरे याखालोखालच मध, गूळ, गवती चहा यांनाही मागणी होती, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यfoodअन्न