शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

कोरोना इफेक्ट : मसाल्याची मागणी अन् कोरोनाच्या भीतीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 16:13 IST

आता जसजशी अनलॉक प्रक्रिया सुरू झाली, तसतशी लोकांच्या मनातून कोरोनाची भीतीही कमी होत आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी आता काढ्याचे नियमित सेवनही थांबविले आहे. 

ठळक मुद्देसध्या पावसाळा असूनही या पदार्थांच्या मागणीत घट झाल्याचे दिसून येते. हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, मिरे, ओवा यांची चारपटीने मागणी वाढली होती

औरंगाबाद : मार्च महिन्याच्या मध्यावर कोरोना भारतात अवतरला आणि त्यानंतर कोरोनाच्या भीतीमुळे कडाक्याचा उन्हाळा असूनही उष्ण पदार्थांची मागणी तीव्रतेने वाढत गेली. आता मात्र कोरोनाच्या भीतीमध्ये जसजशी घट होत आहे, तसतशी घट आता उष्ण पदार्थांच्या मागणीतही होताना दिसते आहे.

कोरोनाचे सर्वात प्रमुख लक्षण म्हणजे सर्दी आणि खोकला. सर्दी, खोकला होऊ नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक जण सतर्क होता. परिणामी उष्ण पदार्थ सेवन करण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत गेली. अशातच आयुष मंत्रालयातर्फे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काढा कसा करायचा, हे सांगण्यात आले. त्यानुसार बहुतांश लोकांनी हळद,  सुंठ, काळे मिरे, ओवा, दालचिनी, लवंग या पदार्थांपासून काढा तयार केला आणि त्याचे नियमित सेवन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐन उन्हाळा असतानाही या पदार्थांच्या मागणीत चारपट वाढ  झाली  होती, असे मोंढ्यातील व्यापारी श्रीकांत खटोड यांनी सांगितले.

एरवी उन्हाळा असताना उष्ण पदार्थांची मागणी घटत जाते आणि थंड पदार्थांची मागणी वाढत जाते, परंतु यावर्षीच्या उन्हाळ्यात मात्र कोरोनाच्या भीतीमुळे पूर्णपणे विरुद्ध चित्र दिसून आले. अनेक घरांमध्ये तर सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याआधीच या पदार्थांपासून केलेला काढा सेवन केला जायचा.  काही  घरांमधील महिलांनी तर एकेक किलो काढा तयार करून ठेवला होता. यासोबतच लसूण, अद्रक यांची मागणीही वाढली. व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत असणारे लिंबू आणि पपई यांनाही चांगलीच मागणी होती. तसेच आवळ्याच्या पदार्थांच्या मागणीमध्ये वाढ होते. काढ्यासोबत अनेक जण मध आणि गूळ हे उष्ण पदार्थही सेवन करायचे. त्यामुळे दालचिनी, हळद,  सुंठ,  लवंग, मिरे याखालोखालच मध, गूळ, गवती चहा यांनाही मागणी होती, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यfoodअन्न