शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

कोरोनामुळे दहावी- बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप ! -- बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ...

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

--

बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ४५८ परीक्षार्थी

---

औरंगाबाद : दहावी- बारावीच्या परीक्षा काॅपीमुक्तीपेक्षा कोरोनामुक्त घेण्याचे आव्हान माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळासमोर आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून ३ लाख ३५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ३८ हजारांनी कमी आहे, तर विभागात सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील असून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी गॅप घेतल्यामुळे यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे यावर्षी कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. ऑफलाईन परीक्षेत फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार आहे. विभागीय मंडळांकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच तयार करून ते राज्य मंडळाकडे सोपविण्यात आले असून प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

---

विभागातील बोर्ड परीक्षेसाठी अर्ज

--

जिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थी

--

औरंगाबाद- ६५,०११ - ५५,१७७

बीड - ४२,५८८- ३६,२६७

जालना - ३१,२९६- २८,२७७

परभणी - २८,४४०- २०,५५२

हिंगोली - १६२७६- ११,५८०

---

दहावीचे परीक्षार्थी

--

२०२० - २ लाख १ हजार ५७२

२०२१ - १ लाख ८३ हजार ६११

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे

---

बारावीचे परीक्षार्थी

---

२०२०- १ लाख ७१ हजार ९५९

२०२१ - १ लाख ५१ हजार ८४७

बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे

---

दहावी बारावीचे एकूण परीक्षार्थी

--

२०२०- ३ लाख ७३ हजार ५३१

२०२१ - ३ लाख ३५ हजार ४५८

---

पुनर्परीक्षार्थी १४ हजार ४५२

---

बारावीचे पुनर्परीक्षार्थी ७ हजार ३४, तर दहावीचे ७ हजार ४१८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ही संख्या मागील वर्षापेक्षा कमी असून त्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका राहील, असे विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

बारावीच्या परीक्षार्थींची संख्या दहावीपेक्षा कमी असली तरी नव्याने परीक्षा देवून चांगले मार्क घेण्याच्या प्रयत्नातील विद्यार्थ्यांची यात अडचण झाली आहे. वर्षभरातील काही दिवस वगळता कोचिंग क्लासेस बंद होते. त्यामुळे स्वाध्याय आणि ऑनलाईवर भर द्यावा लागला.