शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

कोरोनामुळे दहावी- बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप ! -- बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ...

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

--

बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ४५८ परीक्षार्थी

---

औरंगाबाद : दहावी- बारावीच्या परीक्षा काॅपीमुक्तीपेक्षा कोरोनामुक्त घेण्याचे आव्हान माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळासमोर आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून ३ लाख ३५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ३८ हजारांनी कमी आहे, तर विभागात सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील असून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी गॅप घेतल्यामुळे यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे यावर्षी कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. ऑफलाईन परीक्षेत फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार आहे. विभागीय मंडळांकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच तयार करून ते राज्य मंडळाकडे सोपविण्यात आले असून प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

---

विभागातील बोर्ड परीक्षेसाठी अर्ज

--

जिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थी

--

औरंगाबाद- ६५,०११ - ५५,१७७

बीड - ४२,५८८- ३६,२६७

जालना - ३१,२९६- २८,२७७

परभणी - २८,४४०- २०,५५२

हिंगोली - १६२७६- ११,५८०

---

दहावीचे परीक्षार्थी

--

२०२० - २ लाख १ हजार ५७२

२०२१ - १ लाख ८३ हजार ६११

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे

---

बारावीचे परीक्षार्थी

---

२०२०- १ लाख ७१ हजार ९५९

२०२१ - १ लाख ५१ हजार ८४७

बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे

---

दहावी बारावीचे एकूण परीक्षार्थी

--

२०२०- ३ लाख ७३ हजार ५३१

२०२१ - ३ लाख ३५ हजार ४५८

---

पुनर्परीक्षार्थी १४ हजार ४५२

---

बारावीचे पुनर्परीक्षार्थी ७ हजार ३४, तर दहावीचे ७ हजार ४१८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ही संख्या मागील वर्षापेक्षा कमी असून त्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका राहील, असे विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

बारावीच्या परीक्षार्थींची संख्या दहावीपेक्षा कमी असली तरी नव्याने परीक्षा देवून चांगले मार्क घेण्याच्या प्रयत्नातील विद्यार्थ्यांची यात अडचण झाली आहे. वर्षभरातील काही दिवस वगळता कोचिंग क्लासेस बंद होते. त्यामुळे स्वाध्याय आणि ऑनलाईवर भर द्यावा लागला.