शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दहावी- बारावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:05 IST

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप ! -- बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ...

बहुसंख्य विद्यार्थ्यांचा यंदा गॅप !

--

बोर्ड परीक्षा : विभागात गेल्यावर्षीपेक्षा ३८ हजारांनी घटली विद्यार्थीसंख्या, ३ लाख ३५ हजार ४५८ परीक्षार्थी

---

औरंगाबाद : दहावी- बारावीच्या परीक्षा काॅपीमुक्तीपेक्षा कोरोनामुक्त घेण्याचे आव्हान माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळासमोर आहे. विभागातील पाच जिल्ह्यांतून ३ लाख ३५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत ३८ हजारांनी कमी आहे, तर विभागात सर्वाधिक विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील असून बहुसंख्य विद्यार्थ्यांनी गॅप घेतल्यामुळे यंदा परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे यावर्षी कोरोनामुळे एप्रिल-मे महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. ऑफलाईन परीक्षेत फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के, तर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाणार आहे. विभागीय मंडळांकडून १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नसंच तयार करून ते राज्य मंडळाकडे सोपविण्यात आले असून प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

---

विभागातील बोर्ड परीक्षेसाठी अर्ज

--

जिल्हा - दहावीचे विद्यार्थी - बारावीचे विद्यार्थी

--

औरंगाबाद- ६५,०११ - ५५,१७७

बीड - ४२,५८८- ३६,२६७

जालना - ३१,२९६- २८,२७७

परभणी - २८,४४०- २०,५५२

हिंगोली - १६२७६- ११,५८०

---

दहावीचे परीक्षार्थी

--

२०२० - २ लाख १ हजार ५७२

२०२१ - १ लाख ८३ हजार ६११

दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे

---

बारावीचे परीक्षार्थी

---

२०२०- १ लाख ७१ हजार ९५९

२०२१ - १ लाख ५१ हजार ८४७

बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे

---

दहावी बारावीचे एकूण परीक्षार्थी

--

२०२०- ३ लाख ७३ हजार ५३१

२०२१ - ३ लाख ३५ हजार ४५८

---

पुनर्परीक्षार्थी १४ हजार ४५२

---

बारावीचे पुनर्परीक्षार्थी ७ हजार ३४, तर दहावीचे ७ हजार ४१८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. ही संख्या मागील वर्षापेक्षा कमी असून त्यांना १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका राहील, असे विभागीय मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

बारावीच्या परीक्षार्थींची संख्या दहावीपेक्षा कमी असली तरी नव्याने परीक्षा देवून चांगले मार्क घेण्याच्या प्रयत्नातील विद्यार्थ्यांची यात अडचण झाली आहे. वर्षभरातील काही दिवस वगळता कोचिंग क्लासेस बंद होते. त्यामुळे स्वाध्याय आणि ऑनलाईवर भर द्यावा लागला.