शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

कोरोना काळजी; औरंगाबाद जिल्ह्यात २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 19:36 IST

corona virus in Aurangabad प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार

ठळक मुद्देवेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. एसटीसह सर्व यंत्रणेला सूचना

औरंगाबाद: कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणांची चिंता वाढली असून नागरिक मात्र कोरोना संपला या आविर्भावातच आलबेल वागू लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी तहसीलस्तरावरील २०० हून अधिक मंगल कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. 

विदर्भातून आणि केरळ व दक्षिण भारतासह कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळत असलेल्या राज्य आणि जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवासी व माल वाहतूक, खासगी वाहनांचे स्क्रिनिंग करण्यासाठी गुरुवारी पोलीस प्रशासनासोबत बैठक होणार आहे. त्या बैठकीत जिल्हा सीमा तपासणी (चेकपोस्ट) अलर्ट करण्याचा निर्णय होणार आहे. केरळमधून येणाऱ्या वाहनांची सध्या तपासणी सुरू आहे. अकोला आणि अमरावतीमधून औरंगाबादमार्गे अनेक वाहने मुंबई व नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात जात आहेत. त्या वाहनांचे स्क्रिनिंग आता करण्यात येणार आहे.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीप्रभारी जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी सांगितले, जिल्ह्यात सर्व मंगल कार्यालयांना तहसील पातळीवर नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. वेळप्रसंगी प्रशासन गुन्हे दाखल करण्यापर्यंत जाईल. गर्दीच्या ठिकाणी नियम कडक करण्यात येणार आहेत. मास्क आणि सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा सीमा तपासणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेसोबत गुरुवारी बैठक होणार आहे.

एसटीसह सर्व यंत्रणेला सूचनाविदर्भासह सर्व जिल्ह्यातून औरंगाबादेत येणाऱ्या एस. टी. बसमधील प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर परिपत्रक काढून अलर्ट देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गव्हाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद