शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

लसीनंतर ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी गाठू शकतो कोरोना; पण गंभीर लक्षणे, मृत्यूपासून मिळते सुरक्षाकवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:23 IST

लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.

ठळक मुद्देकोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

औरंगाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ढाल ठरणारी प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. लस निश्चितच सुरक्षाकवच ठरत आहे. पण ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी कोरोना गाठू शकतो. कारण लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी ॲॅण्टिबाॅडीज तयार होतात. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता जवळपास १९ टक्के आहे. शिवाय लसीमुळे कोरोनाची गंभीर लक्षणे टळतात. लसीकरणानंतरही मास्कचा वापर महत्त्वपूर्ण असून, कोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

लसीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. मात्र, संसर्ग अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. जिल्ह्यात दोन कोरोना लसी उपलब्ध असून, त्या जवळपास ७२ ते ८१ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते. कोणतीच लस १०० टक्के परिणामकारक नसते आणि कोरोना लसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे लस घेऊनही प्रतिकारशक्ती तयार झाली नाही, प्रतिकारशक्ती तयार होण्यापूर्वी कोरोनाची लागण होणे, असे काही लोकांच्या बाबतीत घडू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

गंभीर लक्षणे टळलीघाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते. त्यामुळे गंभीर लक्षणे टळण्यास मदत झाली. गंभीर लक्षणे नसल्यानेच घाटीतील आक्सिजन बेड गरजू रुग्णाला उपलब्ध होण्यासाठी त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य दिला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांनीही लसीचे दोन डोस घेतले होते. कोरोना लसीचा फायदा झाल्यामुळे कोणताही त्रास नसल्याने त्यांनी होम आयसोलेशन म्हणजे घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले.

भिती, शंका मनात न आणता लस घ्यावीकोव्हिशील्ड लस आणि कोव्हॅक्सिन लस अतिशय परिणामकारक आहेत. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनंतर संरक्षक अँटीबाॅडीज तयार होतात. त्यानंतरही कोरोना झाला तर आजार गंभीर होत नाही. मृत्यूचा धोकाही टळतो. लक्षणे अतिशय सौम्य असतात. त्यामुळे कोणतीही भिती, शंका मनात न आणता पात्र लोकांनी लस घेतली पाहिजे. सध्या मास्क आणि लस या दोन गोष्टी आपल्याकडे आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे.- डॉ. जगन्नाथ दीक्षित, लसीकरण नोडल ऑफिसर व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद