शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

लसीनंतर ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी गाठू शकतो कोरोना; पण गंभीर लक्षणे, मृत्यूपासून मिळते सुरक्षाकवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:23 IST

लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.

ठळक मुद्देकोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

औरंगाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ढाल ठरणारी प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. लस निश्चितच सुरक्षाकवच ठरत आहे. पण ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी कोरोना गाठू शकतो. कारण लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी ॲॅण्टिबाॅडीज तयार होतात. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता जवळपास १९ टक्के आहे. शिवाय लसीमुळे कोरोनाची गंभीर लक्षणे टळतात. लसीकरणानंतरही मास्कचा वापर महत्त्वपूर्ण असून, कोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

लसीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. मात्र, संसर्ग अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. जिल्ह्यात दोन कोरोना लसी उपलब्ध असून, त्या जवळपास ७२ ते ८१ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते. कोणतीच लस १०० टक्के परिणामकारक नसते आणि कोरोना लसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे लस घेऊनही प्रतिकारशक्ती तयार झाली नाही, प्रतिकारशक्ती तयार होण्यापूर्वी कोरोनाची लागण होणे, असे काही लोकांच्या बाबतीत घडू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

गंभीर लक्षणे टळलीघाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते. त्यामुळे गंभीर लक्षणे टळण्यास मदत झाली. गंभीर लक्षणे नसल्यानेच घाटीतील आक्सिजन बेड गरजू रुग्णाला उपलब्ध होण्यासाठी त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य दिला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांनीही लसीचे दोन डोस घेतले होते. कोरोना लसीचा फायदा झाल्यामुळे कोणताही त्रास नसल्याने त्यांनी होम आयसोलेशन म्हणजे घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले.

भिती, शंका मनात न आणता लस घ्यावीकोव्हिशील्ड लस आणि कोव्हॅक्सिन लस अतिशय परिणामकारक आहेत. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनंतर संरक्षक अँटीबाॅडीज तयार होतात. त्यानंतरही कोरोना झाला तर आजार गंभीर होत नाही. मृत्यूचा धोकाही टळतो. लक्षणे अतिशय सौम्य असतात. त्यामुळे कोणतीही भिती, शंका मनात न आणता पात्र लोकांनी लस घेतली पाहिजे. सध्या मास्क आणि लस या दोन गोष्टी आपल्याकडे आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे.- डॉ. जगन्नाथ दीक्षित, लसीकरण नोडल ऑफिसर व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद