शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

लसीनंतर ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी गाठू शकतो कोरोना; पण गंभीर लक्षणे, मृत्यूपासून मिळते सुरक्षाकवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:23 IST

लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते.

ठळक मुद्देकोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

औरंगाबाद : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ढाल ठरणारी प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतरही काही जण कोरोनाबाधित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. लस निश्चितच सुरक्षाकवच ठरत आहे. पण ॲण्टिबाॅडीज तयार होण्यापूर्वी कोरोना गाठू शकतो. कारण लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनी ॲॅण्टिबाॅडीज तयार होतात. लस घेतल्यानंतरही कोरोना होण्याची शक्यता जवळपास १९ टक्के आहे. शिवाय लसीमुळे कोरोनाची गंभीर लक्षणे टळतात. लसीकरणानंतरही मास्कचा वापर महत्त्वपूर्ण असून, कोणतीही शंका आणि भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

लसीचा दुसरा डोस झाल्यानंतरही संसर्ग होऊ शकतो. मात्र, संसर्ग अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. जिल्ह्यात दोन कोरोना लसी उपलब्ध असून, त्या जवळपास ७२ ते ८१ टक्के परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. लसीचा दुसरा डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती होण्याची शक्यता अगदी कमी असते. कोणतीच लस १०० टक्के परिणामकारक नसते आणि कोरोना लसही त्याला अपवाद नाही. त्यामुळे लस घेऊनही प्रतिकारशक्ती तयार झाली नाही, प्रतिकारशक्ती तयार होण्यापूर्वी कोरोनाची लागण होणे, असे काही लोकांच्या बाबतीत घडू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

गंभीर लक्षणे टळलीघाटीच्या अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी लसीचे दोन डोस घेतले होते. त्यामुळे गंभीर लक्षणे टळण्यास मदत झाली. गंभीर लक्षणे नसल्यानेच घाटीतील आक्सिजन बेड गरजू रुग्णाला उपलब्ध होण्यासाठी त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल होण्यास प्राधान्य दिला. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांनीही लसीचे दोन डोस घेतले होते. कोरोना लसीचा फायदा झाल्यामुळे कोणताही त्रास नसल्याने त्यांनी होम आयसोलेशन म्हणजे घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिले.

भिती, शंका मनात न आणता लस घ्यावीकोव्हिशील्ड लस आणि कोव्हॅक्सिन लस अतिशय परिणामकारक आहेत. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १५ दिवसांनंतर संरक्षक अँटीबाॅडीज तयार होतात. त्यानंतरही कोरोना झाला तर आजार गंभीर होत नाही. मृत्यूचा धोकाही टळतो. लक्षणे अतिशय सौम्य असतात. त्यामुळे कोणतीही भिती, शंका मनात न आणता पात्र लोकांनी लस घेतली पाहिजे. सध्या मास्क आणि लस या दोन गोष्टी आपल्याकडे आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे.- डॉ. जगन्नाथ दीक्षित, लसीकरण नोडल ऑफिसर व जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, घाटी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद