शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

कूलींच्या आयुष्याची गाडी ट्रॅकबाहेर; चाकाची बॅग, लिफ्ट, सरकत्या जिन्यानंतर आता कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:46 IST

लॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले.

ठळक मुद्देकोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत.एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महानायक अमिताभ बच्चन यांचा कूली चित्रपट आणि त्यातील ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं’ या गाण्यातून प्रवाशांच्या ओझ्याने आयुष्याची गाडी ओढणाऱ्या कूलींचे प्रश्न जगासमोर आले. पुढे गोविंदाच्या ‘कूली नंबर वन’ चित्रपटातूही मनोरंजनात्मक पद्धतीने कूलींची अवस्था मांडण्यात आली.

चित्रपट हीट झाले; पण कूलींचे प्रश्न तसेच राहिले. कोरोनामुळे आता तर त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा, चारचाकीतून प्रवासी उतरतात, तेव्हा लाल रंगाचा शर्ट परिधान केलेले कूली आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहतात. ‘ए कूली... ए कूली...’ अशी हाक एखादा प्रवासी मारेल, याकडे त्यांचे कान असतात; परंतु प्रवासी कूलींकडे दुर्लक्ष करतात, कोणी जवळ आले तर सरळ दूर करतात. चाकाची सुटकेस, बॅग ओढत रेल्वेस्टेशनमधून रवाना होतात. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या असेच दृश्य पाहायला मिळते आहे. प्रवासात कमी सामान घेऊन जाण्याचा वाढलेला कल, हँडल-चाकाच्या सुटकेस, बॅगमुळे ओझे कमी झाले. त्याचा फटका बसला तो कूलींनाच. रेल्वेस्टेशनवर काही वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, सरकत्या जिन्यांची सुविधा करण्यात आली. या सुविधांनी कूलींच्या बेरोजगारीचे संकट गडद झाले. त्यात आता कोरोनाची भर पडली आहे. कोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत. रेल्वेस्टेशनवर सध्या १४ कूली आहेत; परंतु एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कूलींपुढे उभा राहिला आहे. रेल्वे प्रशासन आणि ज्यांनी कूलींच्या अभिनयातून स्वतःचे विश्व उभे केले, किमान ते तरी कूलींच्या मदतीसाठी येतील का, असा प्रश्न या कूलींना पडतो आहे. जगायचे कसे, हा प्रश्न कूली शेख रफिक म्हणाले, कोरोनामुळे  रेल्वे बंद केल्या. कूली कसे जगतील, याचा कोणी  विचारही केला नाही. तरीही कसे तरी दिवस काढले; पण आता तर भीतीने प्रवासी जवळही येऊ देत नाहीत. 

लॉकडाऊनमध्ये सामाजिक संस्थांची मदतलॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले. एक-एक दिवस कसे काढले, हे सांगताही येत नाही. आताही रेल्वेंची वाहतूक पूर्ववत नसल्याने रेल्वेस्टेशनवर कामच उरले नाही. त्यामुळे सिमेंटच्या गोण्या उतरविण्यासह मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहे. -राहुल दुसिंग, कुली

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद