शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

कूलींच्या आयुष्याची गाडी ट्रॅकबाहेर; चाकाची बॅग, लिफ्ट, सरकत्या जिन्यानंतर आता कोरोनाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 14:46 IST

लॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले.

ठळक मुद्देकोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत.एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : महानायक अमिताभ बच्चन यांचा कूली चित्रपट आणि त्यातील ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं’ या गाण्यातून प्रवाशांच्या ओझ्याने आयुष्याची गाडी ओढणाऱ्या कूलींचे प्रश्न जगासमोर आले. पुढे गोविंदाच्या ‘कूली नंबर वन’ चित्रपटातूही मनोरंजनात्मक पद्धतीने कूलींची अवस्था मांडण्यात आली.

चित्रपट हीट झाले; पण कूलींचे प्रश्न तसेच राहिले. कोरोनामुळे आता तर त्यांचे अस्तित्वच संकटात आले आहे. रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा, चारचाकीतून प्रवासी उतरतात, तेव्हा लाल रंगाचा शर्ट परिधान केलेले कूली आशाळभूत नजरेने त्यांच्याकडे पाहतात. ‘ए कूली... ए कूली...’ अशी हाक एखादा प्रवासी मारेल, याकडे त्यांचे कान असतात; परंतु प्रवासी कूलींकडे दुर्लक्ष करतात, कोणी जवळ आले तर सरळ दूर करतात. चाकाची सुटकेस, बॅग ओढत रेल्वेस्टेशनमधून रवाना होतात. 

औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर सध्या असेच दृश्य पाहायला मिळते आहे. प्रवासात कमी सामान घेऊन जाण्याचा वाढलेला कल, हँडल-चाकाच्या सुटकेस, बॅगमुळे ओझे कमी झाले. त्याचा फटका बसला तो कूलींनाच. रेल्वेस्टेशनवर काही वर्षांपूर्वी प्लॅटफॉर्मवर लिफ्ट, सरकत्या जिन्यांची सुविधा करण्यात आली. या सुविधांनी कूलींच्या बेरोजगारीचे संकट गडद झाले. त्यात आता कोरोनाची भर पडली आहे. कोरोनामुळे औरंगाबादेत अवघ्या ८ रेल्वे दिवसभरात ये-जा करीत आहेत. रेल्वेस्टेशनवर सध्या १४ कूली आहेत; परंतु एकालाही दिवसभरात दोन वेळच्या जेवणाएवढेही पैसे मिळत नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न या कूलींपुढे उभा राहिला आहे. रेल्वे प्रशासन आणि ज्यांनी कूलींच्या अभिनयातून स्वतःचे विश्व उभे केले, किमान ते तरी कूलींच्या मदतीसाठी येतील का, असा प्रश्न या कूलींना पडतो आहे. जगायचे कसे, हा प्रश्न कूली शेख रफिक म्हणाले, कोरोनामुळे  रेल्वे बंद केल्या. कूली कसे जगतील, याचा कोणी  विचारही केला नाही. तरीही कसे तरी दिवस काढले; पण आता तर भीतीने प्रवासी जवळही येऊ देत नाहीत. 

लॉकडाऊनमध्ये सामाजिक संस्थांची मदतलॉकडाऊनच्या काळात सामाजिक संस्थांनी मदत केली. त्यामुळे काही दिवस काढता आले. एक-एक दिवस कसे काढले, हे सांगताही येत नाही. आताही रेल्वेंची वाहतूक पूर्ववत नसल्याने रेल्वेस्टेशनवर कामच उरले नाही. त्यामुळे सिमेंटच्या गोण्या उतरविण्यासह मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत आहे. -राहुल दुसिंग, कुली

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबाद