शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

वाढीव मुदतीमुळे शेतकऱ्यांची सोय

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. सेनगाव तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. पावसाने दडी मारल्याने तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. तब्बल दीड महिना पेरणीस विलंब झाला असून, दुबार पेरणीचे संकट डोकावत असताना राष्ट्रीय पीकविमा योजनेत ३१ जुलैपर्यंत तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांनी भरला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत कळमनुरी तालुक्यातील ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला. विम्याची रक्कम ३६ लाख ९४ हजार एवढी आहे. पुन्हा पीकविमा उतरविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला असून, शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. त्याकरिता यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचे आवाहनही काळे यांनी केले आहे. पीकविमा उतरविण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत १५०० शेतकऱ्यांनी ७ लाख ४५ हजार, आखाडा बाळापूर ९१६ शेतकऱ्यांनी ८ लाख ५५ हजार, कोंढूर येथे ९० शेतकऱ्यांनी ६१ हजार, नांदापूर येथे २२५ शेतकऱ्यांनी १ लाख ९५ हजार, डोंगरकडा येथे ९०० शेतकऱ्यांनी ५ लाख ८८ हजार, पोत्रा येथे १०० शेतकरी ९५ हजार, वारंगाफाटा येथे ५०० शेतकरी ५ लाख ७० हजार, गौळबाजार येथे ७०० शेतकरी ५ लाख ९० हजार असे एकूण ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा ३६ लाख ९४ हजारांचा विमा उतरविला आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी ६०२ रुपये कापूस हेक्टरी २ हजार ७५६ रुपये, तूर ४६८ रुपये, मूग ३०३, उडीद ३२८ रुपये प्रमाणे विमा उतरविला आहे. शेतकऱ्यांनी पिकविमा १५ आॅगस्टपर्यंत उतरवा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काळे यांनी केले आहे. (वार्ताहर)आता १५ आॅगस्टपर्यंत विमा काढा राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. यंदा हिंगोली जिल्ह्यात पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.पेरणीपूर्वी पीकविमा कसा भरणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत पीक विम्याची मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत.बिकट स्थितीत ३१ जुलैपर्यंत विका भरणाऱ्या ४ हजार २९० शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर झाला तर ९ कोटी ८५ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. पीकविमा न काढलेल्या व १ आॅगस्टनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी १५ आॅगस्टपर्यंत पीकविमा भरावा, असे आवाहन सेनगावचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.हरणे यांनी केले आहे.