शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

वाढीव मुदतीमुळे शेतकऱ्यांची सोय

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे.

सेनगाव/कळमनुरी : राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत विमा भरण्यास मुदतवाढ मिळाल्याने पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. सेनगाव तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. पावसाने दडी मारल्याने तालुक्यात खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. तब्बल दीड महिना पेरणीस विलंब झाला असून, दुबार पेरणीचे संकट डोकावत असताना राष्ट्रीय पीकविमा योजनेत ३१ जुलैपर्यंत तालुक्यातील ४ हजार २९९ शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत ३४ लाख ९० हजार रूपयांचा पीकविमा भरला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा पीकविमा शेतकऱ्यांनी भरला आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत कळमनुरी तालुक्यातील ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला. विम्याची रक्कम ३६ लाख ९४ हजार एवढी आहे. पुन्हा पीकविमा उतरविण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडला असून, शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविणे गरजेचे आहे. त्याकरिता यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरविण्याचे आवाहनही काळे यांनी केले आहे. पीकविमा उतरविण्यासाठी १६ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत १५०० शेतकऱ्यांनी ७ लाख ४५ हजार, आखाडा बाळापूर ९१६ शेतकऱ्यांनी ८ लाख ५५ हजार, कोंढूर येथे ९० शेतकऱ्यांनी ६१ हजार, नांदापूर येथे २२५ शेतकऱ्यांनी १ लाख ९५ हजार, डोंगरकडा येथे ९०० शेतकऱ्यांनी ५ लाख ८८ हजार, पोत्रा येथे १०० शेतकरी ९५ हजार, वारंगाफाटा येथे ५०० शेतकरी ५ लाख ७० हजार, गौळबाजार येथे ७०० शेतकरी ५ लाख ९० हजार असे एकूण ४ हजार ९३१ शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा ३६ लाख ९४ हजारांचा विमा उतरविला आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी ६०२ रुपये कापूस हेक्टरी २ हजार ७५६ रुपये, तूर ४६८ रुपये, मूग ३०३, उडीद ३२८ रुपये प्रमाणे विमा उतरविला आहे. शेतकऱ्यांनी पिकविमा १५ आॅगस्टपर्यंत उतरवा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी काळे यांनी केले आहे. (वार्ताहर)आता १५ आॅगस्टपर्यंत विमा काढा राष्ट्रीय पीकविमा योजनेअंतर्गत पीकविमा भरण्याची ३१ जुलै ही अंतिम मुदत होती. यंदा हिंगोली जिल्ह्यात पाऊस लांबल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत.पेरणीपूर्वी पीकविमा कसा भरणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. पीकविमा भरण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत होती. या मागणीची दखल घेत पीक विम्याची मुदत १५ आॅगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके धोक्यात आली आहेत.बिकट स्थितीत ३१ जुलैपर्यंत विका भरणाऱ्या ४ हजार २९० शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर झाला तर ९ कोटी ८५ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. पीकविमा न काढलेल्या व १ आॅगस्टनंतर पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी १५ आॅगस्टपर्यंत पीकविमा भरावा, असे आवाहन सेनगावचे तालुका कृषी अधिकारी आर.बी.हरणे यांनी केले आहे.