शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणलोट’चे कंत्राटी कर्मचारी वेतनाविना

By admin | Updated: May 30, 2014 00:35 IST

हिंगोली : आॅनलाईन माहिती भरण्याच्या कारणावरून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे.

 हिंगोली : आॅनलाईन माहिती भरण्याच्या कारणावरून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन रखडले आहे. परिणामी मागील तीन महिन्यांपासून पगाराअभावी काम करणार्‍या ९० कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात राज्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. हिंगोली जिल्ह्यात या कर्मचार्‍यांची संख्या ९० असून मागील तीन वर्षांपासून ते कार्यरत आहेत. पाणलोटच्या जनजागृतीपासून ते व्यवस्थापनापर्यंतची कामे हे कर्मचारी करतात. गावागावात जावून कर्मचारी पाणलोटबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. योजना चांगल्या रितीने राबविण्यासाठी योग्य तो सल्लाही कर्मचार्‍यांकडून दिला जातो. जिल्ह्यात तीन वर्षांपासून काम करणार्‍या या कर्मचार्‍यांवर मात्र संकट ओढवले आहे. पाणलोट अतंर्गत झालेल्या कामांची आॅनलाईन नोंद (एमआयएस) केली नसल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन रोखण्यात आले आहे. यापूर्वी या कर्मचार्‍यांना कृषी कार्यालयातील संगणकावर आॅलनाईन माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर कार्यालयाऐवजी नेटकॅफेवरून महिती भरण्याचा आदेश कृषी विभागाने दिला. लॅपटॉप किवा संगणक अशी कोणतीही सुविधा न देता आदेश दिल्यामुळे कर्मचारी गोंधळात पडले. कर्मचार्‍यांनी नेटकॅफेवर जावून माहिती भरण्याचा प्रयत्न केला असता नेहमी संकेतस्थळ जाम राहत असल्याची तक्रार आहे. त्यातच कृषी सहाय्यक आणि सुपरवायझरकडून माहिती देण्यात आली नसल्याने कर्मचार्‍यांना संगणकावर माहिती भरता आलेली नाही. परिणामी सलग तीन महिन्यांपासून या कर्मचार्‍यांना वेतनाअभावी काम करावे लागत आहे. पहिल्या महिन्यात वेतन रखडल्यानंतर दुसर्‍याही महिन्यात कर्मचार्‍यांचे वेतन करण्यात आले नाही. विशेष म्हणजे तिसरा महिनादेखील वेतनाविना गेला आहे. वेतनाअभावी या कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी घरून पैसे मागवावे लागत आहेत. दरम्यान वारंवार वेतनाची मागणी केल्यानंतरही कृषी विभागाकडून त्यांचे वेतन करण्यात आलेले नाही. सध्या या कर्मचार्‍यांचे कामात लक्ष लागत नसून त्यांना वेतनाअभावी आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. कृषी विभागाने कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन लवकर अदा करावे, अशी मागणी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खिल्लारे, सचिव सोळुंके यांनी केली आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांचा भ्रमणध्वनी लावला असता तो बंद होता. (प्रतिनिधी) जिल्ह्यातील ९० कर्मचार्‍यांना वेतनाची प्रतीक्षा एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमात राज्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत असून हिंगोली जिल्ह्यात मागील ३ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची संख्या ९० आहे. पाणलोट अतंर्गत झालेले कामांची आॅनलाईन नोंद (एमआयएस) केली नसल्यामुळे जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन आले रोखण्यात आले आहे. वारंवार वेतनाची मागणी केल्यानंतरही कृषी विभागाकडून त्यांचे वेतन करण्यात आले नसल्यामुळे सध्या या कर्मचार्‍यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. लवकर वेतन करावे, अशी मागणी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय खिल्लारे, सचिव सोळंके यांनी केली आहे.