शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदार ग्रामपंचायतींना लगाम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2015 00:47 IST

उस्मानाबाद : कामांचा वाढलेला व्याप आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण पुढे करीत शासनाने कंत्राटदार ग्रामपंचायतींना एक प्रकारे लगाम घालणारा आदेश काढला आहे.

उस्मानाबाद : कामांचा वाढलेला व्याप आणि मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण पुढे करीत शासनाने कंत्राटदार ग्रामपंचायतींना एक प्रकारे लगाम घालणारा आदेश काढला आहे. यापुढे ग्रामपंचायतींना गावठाण हद्दितील मुलभूत सुविधांसोबतच अन्य विकास कामे करता येणार आहेत. मात्र, या निर्णयाला जि.प. पदाधिकाऱ्यांतून विरोध होऊ लागला आहे.ग्रामपंचायती सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना थेट ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे आता कामाचा व्याप वाढल्याचे कारण पुढे करीत कंत्राटदार (एजन्सी) म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची चांगीच गोची केली आहे. ग्रामपंचायतींकडे पुरेशे मनुष्यबळ नसल्याचे सांगत कामाचे कार्यक्षेत्र मर्यादित करण्यात आले आहे. यापुढे ग्रामपंचायतींना गावठाणाबाहेरील कामे करता येणार नाहीत, असा स्पष्ट आदेश काढला आहे. मात्र, गावठाण हद्दितील मुलभूत सुविधा/विकास कामे करता येणार आहेत. शाळा इमारत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यासारखी कामे गावठाणाच्या हद्दीत नसली तरी ती ग्रामपंचायतींना करता येणार असल्याचेही निर्णयामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ही कामे करताना ३ लाखांपेक्षा जास्तीच्या रक्कमेच्या विकास कामाचे इ-टेंडर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी यापुढे ग्रामपंचायतींना शिवारातील कामे करताना मर्यादा येणार असल्याचे या निर्णयाच्या माध्यमातून समोर येते. दरम्यान, सरदरील शासन निर्णयाचे बांधकाम समितीच्या बैठकीत वाचन करण्यात आले. परंतु, काही सदस्यांनी त्याला विरोध दर्शविला. पूर्वीचेच निकष काम ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली. (प्रतिनिधी)