शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान; बैठकीच्या सूचनेवर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:32 IST

विशेष स्थायी समितीची बैठक सोमवारी ठेवण्यात यावी, असे निर्देश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेतील बैठकांचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यांनी पीठासन अधिकारी तथा अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान केला आहे, असे मत जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केले

औरंगाबाद : विशेष स्थायी समितीची बैठक सोमवारी (२२ जानेवारी) ठेवण्यात यावी, असे निर्देश दिल्यानंतरही मागील पाच दिवसांत जिल्हा परिषदेतील बैठकांचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यांनी पीठासन अधिकारी तथा अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान केला आहे, असे मत जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केले असून, त्यांनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिका-यांवर कारवाई करावी, यासंबंधीचे पत्र ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांना दिले आहे.

‘लोकमत’मध्ये आज सोमवारच्या अंकात ‘सदस्यांची मागणी चुकीची’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. तेव्हा कुठे जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांना विशेष स्थायी समितीच्या बैठकीचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची बाब समजली.दुपारनंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सदस्यही जमा झाले. त्यानंतर अध्यक्ष आणि सदस्यांच्या चर्चेअंती असा निर्णय घेण्यात आला की, अविनाश गलांडे, किशोर बलांडे आणि रमेश गायकवाड या तीन सदस्यांनी संयुक्त पत्राद्वारे टंचाई आणि ‘एमआरईजीएस’ या दोन विषयांवर चर्चा करण्यासाठी २२ जानेवारी रोजी विशेष स्थायी समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली होती.

अध्यक्षांनी सदस्यांच्या मागणीनुसार सोमवारी बैठक आयोजित करावी व त्यासंबंधीची नोटीस निर्गमित करावी, असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांना दिले होते. मात्र, कापसे यांनी सदस्य सचिव या नात्याने बैठकीची नोटीस निर्गमित न करता त्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे कोणत्या नियमाच्या आधारे सादर केली, याचे स्पष्टीकरण मागविण्यात यावे. त्यानुसार २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे, या आशयाची नोटीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे यांना दुपारीच अध्यक्षा डोणगावकर यांनी जारी केली. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या की, यापूर्वी पाणीटंचाई, टंचाई आराखडा व उपाययोजनेबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झालेली आहे.