शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान; बैठकीच्या सूचनेवर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:32 IST

विशेष स्थायी समितीची बैठक सोमवारी ठेवण्यात यावी, असे निर्देश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेतील बैठकांचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यांनी पीठासन अधिकारी तथा अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान केला आहे, असे मत जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केले

औरंगाबाद : विशेष स्थायी समितीची बैठक सोमवारी (२२ जानेवारी) ठेवण्यात यावी, असे निर्देश दिल्यानंतरही मागील पाच दिवसांत जिल्हा परिषदेतील बैठकांचे पदसिद्ध सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिका-यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यांनी पीठासन अधिकारी तथा अध्यक्षांच्या निर्देशाचा अवमान केला आहे, असे मत जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी व्यक्त केले असून, त्यांनी यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिका-यांवर कारवाई करावी, यासंबंधीचे पत्र ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व विभागीय आयुक्तांना दिले आहे.

‘लोकमत’मध्ये आज सोमवारच्या अंकात ‘सदस्यांची मागणी चुकीची’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. तेव्हा कुठे जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांना विशेष स्थायी समितीच्या बैठकीचा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची बाब समजली.दुपारनंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सदस्यही जमा झाले. त्यानंतर अध्यक्ष आणि सदस्यांच्या चर्चेअंती असा निर्णय घेण्यात आला की, अविनाश गलांडे, किशोर बलांडे आणि रमेश गायकवाड या तीन सदस्यांनी संयुक्त पत्राद्वारे टंचाई आणि ‘एमआरईजीएस’ या दोन विषयांवर चर्चा करण्यासाठी २२ जानेवारी रोजी विशेष स्थायी समितीची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली होती.

अध्यक्षांनी सदस्यांच्या मागणीनुसार सोमवारी बैठक आयोजित करावी व त्यासंबंधीची नोटीस निर्गमित करावी, असे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे यांना दिले होते. मात्र, कापसे यांनी सदस्य सचिव या नात्याने बैठकीची नोटीस निर्गमित न करता त्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे कोणत्या नियमाच्या आधारे सादर केली, याचे स्पष्टीकरण मागविण्यात यावे. त्यानुसार २४ तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे, या आशयाची नोटीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी कापसे यांना दुपारीच अध्यक्षा डोणगावकर यांनी जारी केली. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर म्हणाल्या की, यापूर्वी पाणीटंचाई, टंचाई आराखडा व उपाययोजनेबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झालेली आहे.