शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

न्याय निवाड्यातून ग्राहकांना दिलासा

By admin | Updated: December 23, 2015 23:54 IST

लातूर : ग्राहकांना फसवून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या दुकानदारांना चांगलाच दणका जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिला असून,

लातूर : ग्राहकांना फसवून नफेखोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या दुकानदारांना चांगलाच दणका जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचने दिला असून, गतवर्षभरात ५४४५ प्रकरणांपैकी ५२४६ प्रकरणांचा निकाल एका झटक्यात न्यायमंचने दिला आहे. तक्रारकर्त्यांना १ कोटी ९८ लाख ७९ हजार ७८१ रुपये मिळवून दिले आहेत. १ जानेवारी ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत दाखल झालेल्या तक्रारींवर हा निकाल जिल्हा न्यायमंचने दिला आहे.जिल्ह्यातील आस्थापनांकडून खरेदी करताना फसवणूक झाल्याची तक्रार ५४४५ ग्राहकांनी तक्रार निवारण न्यायमंचाकडे दाखल केली होती. १ जानेवारी ते २२ डिसेंबर २०१५ या कालावधीत या तक्रारी न्यायमंचात दाखल झाल्या. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायमंचने ५ हजार ४४५ पैकी ५ हजार २४६ प्रकरणांचा निकाल दिला असून, केवळ १९९ प्रकरणे प्रलंबित आहेत. जानेवारी २०१५ ते मार्च २०१५ या कालावधीत दिलेल्या निकालात ३३ लाख ३९ हजार १७० पीएलए प्रदान करण्यात आला आहे. तर एप्रिल २०१५ ते २२ डिसेंबर २०१५ पर्यंत १ कोटी ६५ लाख ४० हजार ६११ रुपयांचा पीएलए देण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण १ कोटी ९८ लाख ६९ हजार ७८१ रुपये या प्रकरणांतील संबंधित ग्राहकांना देण्याबाबतचे निर्देश न्यायमंचने त्या-त्या आस्थापनांच्या मालकांना दिले आहेत. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचामध्ये सध्या एकूण २२५ प्रकरणे दाखल आहेत. त्यात बँक १७, मेडिकल ८, इन्शुरन्स कंपन्या ९०, बिल्डर ५, एमएसईबी २५ व अन्य ८० अशा एकूण २५५ प्रकरणांबाबत न्यायमंचामध्ये सुनावण्या सुरू आहेत. तक्रारकर्त्यांची तक्रार व संबंधित आस्थापनांच्या प्रमुखांचे म्हणणे जाणून घेण्यात येत आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांना तक्रार निवारण न्यायमंचातून तात्काळ न्याय मिळत असल्याने आता तक्रारी दाखल करण्याचा ओघही वाढला आहे. (प्रतिनिधी)लग्न सोहळ्यातील वधूसाठी घेण्यात आलेला शालू खराब असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तो एका ग्राहकाने परत केला. मात्र संबंधित दुकानदाराने तो बदलून दिला नाही. शालूत काय दोष आहे, अशी विचारणा दुकानदाराने केली. त्यामुळे हे प्रकरण ग्राहक तक्रार न्यायमंचमध्ये गेले. तक्रारकर्ता आणि दुकानदारांचे तसेच कागदपत्र आणि दोघांचे लेखी म्हणणे, उभयतांच्या तोंडी युक्तिवादाचे बारकाईने अवलोकन करून न्यायमंचने १७ डिसेंबर रोजी निकाल दिला. ३० दिवसांच्या आत तक्रारकर्त्याला ८५०० रुपये तसेच त्रासापोटी १ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १ हजार रुपये देण्यात यावे, असा आदेश आहे.