शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू

By admin | Updated: December 1, 2014 01:25 IST

औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही.

औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आता संघर्ष पुकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त कवयित्री डॉ. अहिरे यांचे ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधि विभागप्रमुख डॉ. साधना पांडे या होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद सचिव नामदेव कचरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, शोषित, वंचित, श्रमिकांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळण्याची हमी संविधानाच्या माध्यमातून मिळाली आहे; पण आजपर्यंत या देशात संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात समता, न्याय प्रस्थापित होऊ शकला नाही. तरीदेखील संविधानाचे मूल्यांकन करण्याचे षड्यंत्र रचले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खडतर परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. शिक्षण, शेती व देशाच्या साधन संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपातून पाहिले होते. मात्र, या देशातील भांडवलदारांनी लोकशाहीच्या शिडी वापरून संविधान गुंडाळून ठेवले, असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय समारोपात डॉ. पांडे म्हणाल्या की, संविधानाची उद्देशिका ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आपली जबाबदारी आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय शिंदे यांनी मानले.