शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू

By admin | Updated: December 1, 2014 01:25 IST

औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही.

औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आता संघर्ष पुकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त कवयित्री डॉ. अहिरे यांचे ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधि विभागप्रमुख डॉ. साधना पांडे या होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद सचिव नामदेव कचरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, शोषित, वंचित, श्रमिकांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळण्याची हमी संविधानाच्या माध्यमातून मिळाली आहे; पण आजपर्यंत या देशात संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात समता, न्याय प्रस्थापित होऊ शकला नाही. तरीदेखील संविधानाचे मूल्यांकन करण्याचे षड्यंत्र रचले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खडतर परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. शिक्षण, शेती व देशाच्या साधन संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपातून पाहिले होते. मात्र, या देशातील भांडवलदारांनी लोकशाहीच्या शिडी वापरून संविधान गुंडाळून ठेवले, असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय समारोपात डॉ. पांडे म्हणाल्या की, संविधानाची उद्देशिका ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आपली जबाबदारी आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय शिंदे यांनी मानले.