शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू

By admin | Updated: December 1, 2014 01:25 IST

औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही.

औरंगाबाद : संविधान हा शोषित, वंचितांचा प्राणवायू असून त्याची आजही प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी आता संघर्ष पुकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय संविधान दिनानिमित्त कवयित्री डॉ. अहिरे यांचे ‘संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधि विभागप्रमुख डॉ. साधना पांडे या होत्या. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, विद्यार्थी संसद सचिव नामदेव कचरे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, शोषित, वंचित, श्रमिकांना माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळण्याची हमी संविधानाच्या माध्यमातून मिळाली आहे; पण आजपर्यंत या देशात संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात समता, न्याय प्रस्थापित होऊ शकला नाही. तरीदेखील संविधानाचे मूल्यांकन करण्याचे षड्यंत्र रचले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खडतर परिश्रमातून संविधानाची निर्मिती केली. शिक्षण, शेती व देशाच्या साधन संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्याचे स्वप्न बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपातून पाहिले होते. मात्र, या देशातील भांडवलदारांनी लोकशाहीच्या शिडी वापरून संविधान गुंडाळून ठेवले, असेही त्या म्हणाल्या.अध्यक्षीय समारोपात डॉ. पांडे म्हणाल्या की, संविधानाची उद्देशिका ही आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली पाहिजे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्त्रियांना विकास प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची आपली जबाबदारी आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संजय शिंदे यांनी मानले.