शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

जिल्हा कचेरीवर भाकपचा मोर्चा

By admin | Updated: August 17, 2014 00:12 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़

परभणी : दुष्काळ जाहीर करताना वापरण्यात येणारा ब्रिटिशकालीन आणेवारी हा निकष कालबाह्य व अशास्त्रीय असल्याने तो रद्द करावा या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ शनिवार बाजार येथून सुरू झालेल्या या मोर्चास स्वा़सै़ कॉ़ सय्यद आझम यांनी हिरवा झेंडा दाखविला़ जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहचल्यानंतर तेथे जाहीर सभेत विसर्जित करण्यात आला़ पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरूद्ध कारवाई करावी, रोहयो कामे व थकीत मजुरी अदा करावी, मागणी करूनही काम न मिळालेल्या पेडगाव, सावळी, भोसी येथील मजुरांना बेरोजगार भत्ता द्यावा, लोअर दूधना लाभक्षेत्रातून वगळलेल्या धामणगाव, देऊळगाव गात या गावांसाठी विशेष उपसा सिंचन योजना द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या़ दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे जाहीर करून शासन दुष्काळग्रस्त जनतेची थट्टा करीत असल्याचा आरोप राजन क्षीरसागर यांनी केला़ दुष्काळ जाहीर करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रिटिशकालीन आणेवारी हा निकष कालबाह्य असून, त्यामुळे पूर्वीच्या दुष्काळात देखील जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळी यादीत आली नव्हती़ तर हजारो गारपीटग्रस्तांना मदतीपासून वंचित रहावे लागले़ त्यामुळे आणेवारीची पद्धत रद्द करावी, अशी मागणी क्षीरसागर यांनी यावेळी केली़ या आंदोलनाचे नेतृत्व कॉ़ राजन क्षीरसागर, माधुरी क्षीरसागर, अ‍ॅड़ लक्ष्मण काळे, आसाराम बुधवंत, लक्ष्मण घोगरे, सखाराम मगर, तुकाराम शिंदे, सय्यद इब्राहीम, गणपत गायकवाड, संदीप सोळंके, नामदेव वैद्य, मंगला खामगावकर, अनिता घोंगडे, विश्वंभर देशमुख, अप्पा कुराडे, शेख अब्दुल, गुलाब पौळ आदींनी केले़ (प्रतिनिधी)