शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा ! जायकवाडी धरणातून चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:54 IST

Water was released from Jayakwadi dam जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता.

ठळक मुद्देजायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव

पैठण : शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणातून  चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांचा गेल्या २५ दिवसा पासून कागदोपत्री पाठपुरावा प्रशासनाकडे सुरू होता. पाणी सुटल्याने चणकवाडी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज दुपारी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. सध्या धरणात  ६६.३८ टक्के जलसाठा शिल्लक असून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनही शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. मंगळवारी शेतकरी चंद्रकांत झारगड यांच्या उपस्थितीत उपअभियंता ज्ञानदेव शिरसाट, सहायक अभियंता संदिप राठोड, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड, रामनाथ तांबे, शेषराव आडसूल, अब्दुल बारी गाजी यांनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पाडली. दरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर या बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय होईल असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलविद्युत प्रकल्प सुरू असल्यास धरणाच्या खाली असलेल्या चणकवाडी बंधाऱ्यात विद्युत निर्मिती नंतर सुटलेले पाणी जमा होते. परंतु जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता. परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व शेती सिंचनासाठी बंधाऱ्यातून शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेल्या आहेत. यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी चंद्रकांत झारगड व परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे,  तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांनी शेतकऱ्यांची समस्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोर मांडून पाणी सोडण्याचा निर्णय करून घेतला असे शेतकरी चंद्रकांत झारगड यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद