शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

शेतकऱ्यांना दिलासा ! जायकवाडी धरणातून चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 18:54 IST

Water was released from Jayakwadi dam जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता.

ठळक मुद्देजायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव

पैठण : शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत मंगळवारी दुपारी जायकवाडी धरणातून  चणकवाडी बंधाऱ्यासाठी गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले. धरणातून पाणी सोडावे म्हणून शेतकऱ्यांचा गेल्या २५ दिवसा पासून कागदोपत्री पाठपुरावा प्रशासनाकडे सुरू होता. पाणी सुटल्याने चणकवाडी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज दुपारी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरी पात्रात विसर्ग करण्यात आला. सध्या धरणात  ६६.३८ टक्के जलसाठा शिल्लक असून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातूनही शेतीसिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरु आहे. मंगळवारी शेतकरी चंद्रकांत झारगड यांच्या उपस्थितीत उपअभियंता ज्ञानदेव शिरसाट, सहायक अभियंता संदिप राठोड, गणेश खराडकर, राजाराम गायकवाड, रामनाथ तांबे, शेषराव आडसूल, अब्दुल बारी गाजी यांनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पार पाडली. दरम्यान आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यातही पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर या बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा निर्णय होईल असे या वेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलविद्युत प्रकल्प सुरू असल्यास धरणाच्या खाली असलेल्या चणकवाडी बंधाऱ्यात विद्युत निर्मिती नंतर सुटलेले पाणी जमा होते. परंतु जायकवाडी प्रकल्पावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या सहा महिण्यापासून बंद असल्याने गोदावरी पात्र व चणकवाडी बंधारा कोरडा पडला होता. परिसरातील अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना व शेती सिंचनासाठी बंधाऱ्यातून शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेल्या आहेत. यामुळे परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली होती. जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी चंद्रकांत झारगड व परिसरातील शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू होता.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका संपर्क प्रमुख दत्ता गोर्डे,  तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ यांनी शेतकऱ्यांची समस्या उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समोर मांडून पाणी सोडण्याचा निर्णय करून घेतला असे शेतकरी चंद्रकांत झारगड यांनी सांगितले.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद