शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भाजप विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 00:27 IST

सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सत्तेवर येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही भाजप सरकारने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही़़ राज्यातही हिच परिस्थिती आहे़ सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, या सरकार विरुद्ध जनआक्रोश सप्ताह पाळला जात आहे़ या अंतर्गत बुधवारी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़सत्ता आल्यानंतर राज्यात एकाही शेतकºयाची आत्महत्या होऊ देणार नाही, कोरडवाहू शेतीत ठिबक सिंचनासाठी ९० टक्के अनुदान देऊ, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात वीज, पाणी देऊ, शेतमालाला ५० टक्के नफा मिळेल, अशी व्यवस्था करू, आदी आश्वासने भाजपाने निवडणुकीपूर्वी दिली होती़ मात्र तीन वर्षांचा कालखंड उलटूनही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही़ राज्यात १२ हजारांपेक्षा अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ जीएसटीमुळे शेती आवजारांच्या किंमती वाढल्या़ शेतकºयांना ५० टक्के नफा तर सोडाच परंतु, हमीभावही मिळत नाही़या सर्व पार्श्वभूमीवर सरकार अपयशी ठरले असून, या सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासह शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, माजी खा़ तुकाराम रेंगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, इरफानूर रहेमान, रवि सोनकांबळे, जयश्रीताई खोबे, अब्दुल सईद, बाळासाहेब देशमुख, नगरसेवक सुनील देशमुख, सचिन देशमुख, अमानउल्ला खान, सालेह चाऊस, पंजाबराव देशमुख, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे, बंडू पाचलिंग, अ‍ॅड़ हनुमंत जाधव, सचिन जवंजाळ, सुरेश काळे, अतिक उर रहेमान, सुहास पंडीत, मलेका गफार, जानूबी, पठाण दुर्राणी खानम, वंदना पवार, जयश्री जाधव, रत्नमाला शिंगणकर, इरफान मलीक, मिनहाज कादरी आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते़