शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

काँग्रेसला हवाय कार्यकर्त्यांचा ‘हात’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:06 IST

काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत गटतट आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम असून, त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने पक्ष कार्य सुरु करण्याचे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे.

राजेश भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात आणि केंद्रात सत्तेत आल्यानंतर जिल्ह्यातील विविध सत्ता केंदे्र काबीज करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. सत्तेच्या सारीपाटात एकीकडे भाजप आक्रमक, तर काँग्रेस बॅकफूटवर असल्याचे चित्र आहे. पक्षांतर्गत गटतट आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम असून, त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने पक्ष कार्य सुरु करण्याचे आव्हान नेत्यांपुढे असणार आहे. तरच आगामी ग्रामपंचायत निवडणुकांत काँग्रेसला ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्हे आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर जिल्ह्यात भाजपने आक्रमकपणे सत्ता राबविण्यास सुरुवात केली. अनेक सत्ताकेंद्रांत चंचूप्रवेश करुन सत्ता मिळविण्यापर्यंत प्रयत्न झाला. जनाधार वाढविण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाची विरोधकाची भूमिका आंदोलनांपुरतीच मर्यादित राहिली. काँग्रेसमध्ये नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी झाल्याने निवडणूक कुणाच्या जिवावर लढवायच्या हाच प्रश्न सर्वांना भेडसावतो आहे. मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्यावर भर राहिला. त्यामुळे नऊ जागांवर बिनविरोध निवडणुक झाली. पण, उर्वरित जागांवर सहमती न झाल्याने नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पॅनलच टाकले नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने बाजी मारली. भाजप नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करुन आपल्या सोयीनुसार जागा निवडून आणल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. विरोधकच हा खºया अर्थाने सत्ताधारी असतो. तोच सत्ताधाºयांवर अंकुश ठेवण्याचे काम करीत असतो. पण दुर्दैवाने हे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत नाही.जिल्ह्यात जालना, परतूर आणि भोकरदन या नगर पालिकांवर काँग्रेसची सत्ता असून, जिल्हा परिषदेतही काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. मात्र, ही सत्ता ठराविक व्यक्तींभोवतीच फिरत असल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे. उघडपणे कुणीही बोलत नसले तरी खाजगीमध्ये अनेकजण आपल्या व्यथा मांडतात. आपली भावना मोकळेपणाने मांडावी असा जिल्ह्यात एकही नेता या कार्यकर्त्यांना जवळचा वाटत नाही, हे पक्षाच्या भवितव्यासाठी धोकादायक आहे. केवळ पक्ष एके पक्ष असे मानून कार्य करणाºया सामान्य कार्यकर्त्यांत नैराश्याचे वातावरण आहे. त्यांच्यात चैतन्य निर्माण करुन नव्या जोमाने राजकीय संघर्ष सुरू करावा लागणार आहे. अन्यथा जिल्ह्यात काँग्रेसला लाभलेली समृद्ध परंपरा खंडित होण्यास वेळ लागणार नाही.पक्षश्रेष्ठींनी लक्ष घालावेमध्यंतरी जालना पालिकेत सत्ता असलेल्या काँग्रेसविरूद्ध भाजपने रणशिंग फुंकत आंदोलन केले होते. याला काँग्रेसकडून तेवढ्याच गंभीरतेने ठोस प्रत्युत्तरच देण्यात आले नाही. यात पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातले असते तर भाजपला जेरीस आणता आले असते, अशी सामान्य कार्यकर्त्यांची भावना आहे.