शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:47 IST

देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देसतीश चव्हाण यांचा दावा : लोकसभा निवडणुकीत जातीय, धार्मिक विद्वेष चालणार नाही

औरंगाबाद : देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले, राज्यस्तरावर भाजप, शिवसेना आणि एमआयएम वगळून धर्मनिरपेक्षता मान्य असणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणार आहे. यासाठीची बोलणी पक्षीय नेतृत्व स्तरावर सुरू आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आतापर्यंत जातीय, धार्मिक विद्वेष पसरवून निवडणुका लढवत होते. यावेळी कोणत्याही प्रकारचा जातीय विद्वेष चालणार नाही. यामुळे आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा कोणालाही सुटली तरी त्याठिकाणी पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाचाच उमेदवार विजयी होईल. नुकत्याच झालेल्या कन्हैयाकुमार यांच्या सभेला युवकांची मोठी गर्दी होती. या युवकांना बदल हवा असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हा बदल युवकच घडवून आणतील. भाजप, शिवसेना आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे तेलंगणा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएमची कोणतीही जादू चालणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असलेले भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुरोगामी पक्षांच्या महाआघाडीत स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरीमराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात आत्महत्या करणाºया काकासाहेब शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला होता. यास नोकरभरतीवर निर्बंध असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खास बाब’ म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश दत्तात्रय शिंदे यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस