शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:47 IST

देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देसतीश चव्हाण यांचा दावा : लोकसभा निवडणुकीत जातीय, धार्मिक विद्वेष चालणार नाही

औरंगाबाद : देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले, राज्यस्तरावर भाजप, शिवसेना आणि एमआयएम वगळून धर्मनिरपेक्षता मान्य असणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणार आहे. यासाठीची बोलणी पक्षीय नेतृत्व स्तरावर सुरू आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आतापर्यंत जातीय, धार्मिक विद्वेष पसरवून निवडणुका लढवत होते. यावेळी कोणत्याही प्रकारचा जातीय विद्वेष चालणार नाही. यामुळे आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा कोणालाही सुटली तरी त्याठिकाणी पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाचाच उमेदवार विजयी होईल. नुकत्याच झालेल्या कन्हैयाकुमार यांच्या सभेला युवकांची मोठी गर्दी होती. या युवकांना बदल हवा असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हा बदल युवकच घडवून आणतील. भाजप, शिवसेना आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे तेलंगणा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएमची कोणतीही जादू चालणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असलेले भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुरोगामी पक्षांच्या महाआघाडीत स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरीमराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात आत्महत्या करणाºया काकासाहेब शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला होता. यास नोकरभरतीवर निर्बंध असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खास बाब’ म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश दत्तात्रय शिंदे यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस