शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

काँग्रेस असो की राष्ट्रवादी; खैरेंचा पराभव अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 23:47 IST

देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.

ठळक मुद्देसतीश चव्हाण यांचा दावा : लोकसभा निवडणुकीत जातीय, धार्मिक विद्वेष चालणार नाही

औरंगाबाद : देशात नुकत्याच जाहीर झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला धक्का बसला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात उमेदवार काँग्रेसचा असो की राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव अटळ असल्याचा दावा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केला.विचारवंत आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवी गौरव समारंभाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आ. चव्हाण यांनी राजकीय प्रश्नांनाही उत्तरे दिली. ते म्हणाले, राज्यस्तरावर भाजप, शिवसेना आणि एमआयएम वगळून धर्मनिरपेक्षता मान्य असणाऱ्या पक्षांची महाआघाडी होणार आहे. यासाठीची बोलणी पक्षीय नेतृत्व स्तरावर सुरू आहे. शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे आतापर्यंत जातीय, धार्मिक विद्वेष पसरवून निवडणुका लढवत होते. यावेळी कोणत्याही प्रकारचा जातीय विद्वेष चालणार नाही. यामुळे आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा कोणालाही सुटली तरी त्याठिकाणी पुरोगामी विचारधारा असलेल्या पक्षाचाच उमेदवार विजयी होईल. नुकत्याच झालेल्या कन्हैयाकुमार यांच्या सभेला युवकांची मोठी गर्दी होती. या युवकांना बदल हवा असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. हा बदल युवकच घडवून आणतील. भाजप, शिवसेना आणि एमआयएम या एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे तेलंगणा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत एमआयएमची कोणतीही जादू चालणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करीत असलेले भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे पुरोगामी पक्षांच्या महाआघाडीत स्वागत असल्याचेही त्यांनी सांगितले.काकासाहेब शिंदे यांच्या भावाला नोकरीमराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात आत्महत्या करणाºया काकासाहेब शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ लिपिकपदावर नोकरी देण्याचा निर्णय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला होता. यास नोकरभरतीवर निर्बंध असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘खास बाब’ म्हणून मान्यता दिली असल्याची माहिती आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. काकासाहेब शिंदे यांचा भाऊ अविनाश दत्तात्रय शिंदे यांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस