शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST

जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले.

जालना : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वासने दिल्याचा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी ‘अच्छे दिन’ ची प्रतिकात्मक पुण्यतिथी म्हणून आंदोलन करण्यात आले.याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बी.एल. गिरी यांना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त करणार, जीवनावश्यक वस्तूंची महागाई रोखणार इत्यादी आश्वासने देण्यात आली. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. अच्छे दिन येणार म्हणून लोकांना भुलविणारी खोटी आश्वासने भाजपा नेत्यांनी दिली. याउलट जनहितविरोधी निर्णय घेण्यास सरकारने सुरूवात केला, असा आरोप करून काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली गांधीचमन येथे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, सेवादल अध्यक्ष प्रशांत वाढेकर, बाबूराव कुलकर्णी, सुभाष काटकर, वसंत डोंगरे, विष्णू कंटुले, सुरेश तळेकर, इकबाल कुरैशी, सदाशिव गाडे, श्रीकिशन जेठे, राम सावंत, ज्ञानेश्वर डुकरे, मंजितराव टकले, सोनाबाई निकाळजे, अशोक उबाळे, शीतल तनपुरे, नगरसेवक अरूण मगरे, संजय भगत, रवि अकोलकर, महेंद्र अकोलकर, राहुल हिवराळे, रमेश गौरक्षक, विष्णू वाघमारे, शेख माजेद, चंद्रकांत पगारे, जाकेर डावरगावकर, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संजय खडके, शेख मोबीन यांची उपस्थिती होती.आंदोलनप्रसंगी बोलताना माजी आमदार गोरंट्याल म्हणाले की, जनहित विरोधी असणाऱ्या व खोटी स्वप्ने दाखवून मते मागणाऱ्या भाजपा सरकारचे खरे रूप लोकांसमोर आले आहे. हे सरकार मोठे उद्योगपती, भांडवलदार व बिल्डर यांच्या फायद्यासाठी काम करत असून शेतकरी व गोरगरीब जनता यांचा सरकारला विसर पडला आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी गोरगरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी विनोद यादव, शेख ईसा, रमाकांत मद्दलवार, अरूण सरदार, शेख अफरोज, मोसीन पठाण, ज्ञानेश्वर उगले, अंजेभाऊ चव्हाण, माणिक राठोड, लता डोंगरे, कादर मोमीन, एस.एन. देशमुख, शेख नसीर, राज स्वामी, राजू वीर, देवीलाल डोंगरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)