शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांवर का संतापले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:34 IST

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

ठळक मुद्देकाँग्रेस: विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचा आरोप

औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.निरपराधांवर होणाºया पोलीस अत्याचारांविरोधात काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी आ. सत्तार यांच्यासह आ. सुभाष झांबड, माजी आ. डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, नितीन पाटील आदी पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकाºयांना भेटण्यासाठी गेले होते. एका बैठकीत असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी त्या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. जिल्हाधिकाºयांनी तातडीने निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाºयांनी घेतली. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सत्तार यांनी करण्यास सुरुवात करताच जिल्हाधिकारी चौधरी आले, मात्र शिष्टमंडळात कॅमेरामन व इतर माध्यम प्रतिनिधींना पाहून ते भडकले निवेदन देतानाचे छायाचित्र काढण्यास जिल्हाधिकाºयांनी विरोध केल्याचा आरोप सत्तार यांनी केला.जिल्हाधिकाºयांनी आम्हाला ताटकळत ठेवले भेट दिली नाही. लोकप्रतिनिधींना योग्य मान सन्मान देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असा सरकारचा अध्यादेश आहे. जिल्हाधिकाºयांना त्याचा विसर पडला की काय,असा सवाल सत्तार व पदाधिकाºयांनी केला.जिल्हाधिकारी म्हणालेजिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले, असे काही घडले नाही. मी शेजारच्या दालनात बैठकीत होतो. कुणाचाही अपमान केला नाही. लोकप्रतिनिधी येणार असल्याची पूर्वसूचना मिळाली नव्हती. ते येणार असल्याची माहिती मिळताच त्यांना दालनात बसण्याचा निरोप दिला होता. दरम्यान काही क्षणातच दालनाबाहेर गदारोळ सुरू झाल्याचे कानावर आले.तीन वर्षांपूर्वी असेच घडले होतेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन बसून स्वीकारले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याचा आरोप त्यावेळी काँगे्रसच्या गोटातून करण्यात आला होता. त्या घटनेनंतर आठवड्यातच जिल्हाधिकाºयांची बदली झाली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण