शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांवर का संतापले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:34 IST

जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

ठळक मुद्देकाँग्रेस: विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याचा आरोप

औरंगाबाद : जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केला.निरपराधांवर होणाºया पोलीस अत्याचारांविरोधात काँग्रेसने सोमवारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चाचे निवेदन देण्यासाठी आ. सत्तार यांच्यासह आ. सुभाष झांबड, माजी आ. डॉ. कल्याण काळे, नामदेव पवार, नितीन पाटील आदी पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी दुपारच्या सुमारास जिल्हाधिकाºयांना भेटण्यासाठी गेले होते. एका बैठकीत असल्याचे सांगून जिल्हाधिकाºयांनी त्या शिष्टमंडळाला ताटकळत ठेवले. जिल्हाधिकाºयांनी तातडीने निवेदन स्वीकारावे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाºयांनी घेतली. लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सत्तार यांनी करण्यास सुरुवात करताच जिल्हाधिकारी चौधरी आले, मात्र शिष्टमंडळात कॅमेरामन व इतर माध्यम प्रतिनिधींना पाहून ते भडकले निवेदन देतानाचे छायाचित्र काढण्यास जिल्हाधिकाºयांनी विरोध केल्याचा आरोप सत्तार यांनी केला.जिल्हाधिकाºयांनी आम्हाला ताटकळत ठेवले भेट दिली नाही. लोकप्रतिनिधींना योग्य मान सन्मान देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्या, असा सरकारचा अध्यादेश आहे. जिल्हाधिकाºयांना त्याचा विसर पडला की काय,असा सवाल सत्तार व पदाधिकाºयांनी केला.जिल्हाधिकारी म्हणालेजिल्हाधिकारी चौधरी यांनी सांगितले, असे काही घडले नाही. मी शेजारच्या दालनात बैठकीत होतो. कुणाचाही अपमान केला नाही. लोकप्रतिनिधी येणार असल्याची पूर्वसूचना मिळाली नव्हती. ते येणार असल्याची माहिती मिळताच त्यांना दालनात बसण्याचा निरोप दिला होता. दरम्यान काही क्षणातच दालनाबाहेर गदारोळ सुरू झाल्याचे कानावर आले.तीन वर्षांपूर्वी असेच घडले होतेतीन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निवेदन बसून स्वीकारले होते. लोकप्रतिनिधींचा अवमान झाल्याचा आरोप त्यावेळी काँगे्रसच्या गोटातून करण्यात आला होता. त्या घटनेनंतर आठवड्यातच जिल्हाधिकाºयांची बदली झाली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण