शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

भाजपातील गद्दारांना दिल्या कानपिचक्या

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. बैठकीत कोअर कमिटीपुढे विरोधात काम करणाऱ्यांचा अहवाल देण्याचा निर्णय झाला. तसेच आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत नगरसेवकांची मते बैठकीत जाणून घेण्यात आली. केंद्रात, राज्यात सत्ता आल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून, मनपा निवडणुकीतही पक्षाला नंबर वन करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येणार आहे. मनपा निवडणुकीत प्रभाग पद्धतीऐवजी वॉर्डरचना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला आ. अतुल सावे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, पश्चिम मतदारसंघातून पराभूत झालेले मधुकर सावंत यांच्यासह पालिकेतील नगरसेवकांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात पाहिजे तसे यश मिळालेले नाही. फुलंब्री, औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, उर्वरित सहा मतदारसंघांत थोड्याफार फरकाने पक्षाचे उमेदवार पडले. त्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन वाढविण्यासाठी आणि सदस्य नोंदणीवर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाला. पश्चिम मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उमेदवार सावंत यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. विधानसभेत ज्यांनी पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केले. त्यांचा सी.आर. खराब करून त्याचा अहवाल कोअर कमिटीला देऊ. अशा धमक्या शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी दिल्या. ४यामुळे पक्षविरोधात काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ज्या मतदारसंघात उमेदवार विजयी झालेत तेथील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी विचार केला जाणार आहे. आ. सावे म्हणाले...४सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. २० टक्के मतदारांची नोंदणी करून घेणे बाकी आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला फार अटीतटीचा सामना करावा लागला. मनपा निवडणुका आता समोर आहेत. ४पालिकेत यश मिळविण्यासाठी मेहनतीने काम करावे लागणार आहे. पक्षविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल, असे आ. अतुल सावे यांनी सांगितले.