शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

काँग्रेसने काढला ‘विधानसभे’चा वचपा

By admin | Updated: April 7, 2016 00:25 IST

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर

गोविंद इंगळे , निलंगानिलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिस्तबध्द नियोजन केले़ त्यामुळेच निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवून त्यांनी दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढत बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकावला़विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारलेल्या अशोकरावांना औराद कृषी उत्पन्न बाजारसमितीवर वर्चस्व निर्माण करता आले नाही़ सलग दोनवेळा अपयश आल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आली होती़ म्हणून केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ दरम्यान विरोधकांची टिकेची झोड सुरु झाली़ विधानसभा, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद असा प्रवास करीत अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडणूक लढवून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला़ तर केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ एकर जमिनीवर डोळा ठेवून निवडणूक लढवित असल्याचा आरोप पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला़ खुद्द अशोकराव पाटील निलंगेकर हे निवडणूकीच्या रिंगणात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह होता़ विरोधकांच्या टिकेला न जुमानता अशोकरावांनी विजयी घोडदौड सुरु केली़ आ़बसवराज पाटील मुरुमकर हेही विधानसभेत केलेल्या मदतीची उत्तराई करत अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले़ व निलंगा तालुक्यातील ६४ गावांतील मतदारांची उमरगा येथे बैठक घेऊन विजयाचा विडा उचलूनच बाहेर पडले़ माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा बैठकीत आवाहन केले होते़ तरीही विधानसभा व औराद बाजारसमितीच्या निवडणूकीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करत अशोकरावांनी व्युव्हरचना करीत मोर्चेबांधणी केली़ गृहभेटी, प्रत्यक्ष कॉर्नर बैठका आवश्यक ठिकाणी सभा लाऊन स्वत: लक्ष देऊन विजयश्री खेचून आणला़ या विजयामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांत आता नवचैतन्य आले असून भविष्यातील अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत़ शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे व अविनाश रेशमे यांनी उमदेवार उभे केले़ मात्र, अभय साळुंके, शिवाजी माने, ईश्वर पाटील, शेषेराव ममाळे यांना विश्वासात न घेतल्याने पराभवाला सामोरे जावे लागले़