शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

काँग्रेसने काढला ‘विधानसभे’चा वचपा

By admin | Updated: April 7, 2016 00:25 IST

गोविंद इंगळे , निलंगा निलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर

गोविंद इंगळे , निलंगानिलंगा विधानसभा व औराद बाजार समितीच्या निवडणूकीत दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांनी पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिस्तबध्द नियोजन केले़ त्यामुळेच निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर दणदणीत विजय मिळवून त्यांनी दोन वेळा झालेल्या पराभवाचा वचपा काढत बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकावला़विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारलेल्या अशोकरावांना औराद कृषी उत्पन्न बाजारसमितीवर वर्चस्व निर्माण करता आले नाही़ सलग दोनवेळा अपयश आल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आली होती़ म्हणून केवळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला़ दरम्यान विरोधकांची टिकेची झोड सुरु झाली़ विधानसभा, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद असा प्रवास करीत अशोकरावांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडणूक लढवून सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला़ तर केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ एकर जमिनीवर डोळा ठेवून निवडणूक लढवित असल्याचा आरोप पुतण्या आ़संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला़ खुद्द अशोकराव पाटील निलंगेकर हे निवडणूकीच्या रिंगणात असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह होता़ विरोधकांच्या टिकेला न जुमानता अशोकरावांनी विजयी घोडदौड सुरु केली़ आ़बसवराज पाटील मुरुमकर हेही विधानसभेत केलेल्या मदतीची उत्तराई करत अशोकरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले़ व निलंगा तालुक्यातील ६४ गावांतील मतदारांची उमरगा येथे बैठक घेऊन विजयाचा विडा उचलूनच बाहेर पडले़ माजी मुख्यमंत्री डॉ़शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा बैठकीत आवाहन केले होते़ तरीही विधानसभा व औराद बाजारसमितीच्या निवडणूकीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करत अशोकरावांनी व्युव्हरचना करीत मोर्चेबांधणी केली़ गृहभेटी, प्रत्यक्ष कॉर्नर बैठका आवश्यक ठिकाणी सभा लाऊन स्वत: लक्ष देऊन विजयश्री खेचून आणला़ या विजयामुळे काँगे्रस कार्यकर्त्यांत आता नवचैतन्य आले असून भविष्यातील अपेक्षा निश्चितच वाढल्या आहेत़ शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे व अविनाश रेशमे यांनी उमदेवार उभे केले़ मात्र, अभय साळुंके, शिवाजी माने, ईश्वर पाटील, शेषेराव ममाळे यांना विश्वासात न घेतल्याने पराभवाला सामोरे जावे लागले़