शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

महापालिकेत काँग्रेसला पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:32 IST

सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.नांदेड - वाघाळा मनपाच्या हद्दीतील सिडको- हडको व वाघाळा परिसरातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते हडको येथील शिवाजी उद्यानाच्या प्रांगणात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार डॉ. करूणा जमदाडे, श्रीनिवास जाधव, मंगला गजानन देशमुख, ललिता मुकुंद बोकारे व विनय विश्वाभंर पाटील- गिरडे यांच्यासह गणपतराव तिडके, माधवराव पांडागळे, नारायणराव जाधव व प्रसिद्ध गायक अनिरूद्ध बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा. चव्हाण म्हणाले, भाजप तसेच शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.‘राष्टÑवादी’ काँग्रेसचे घडयाळ तर सद्या बंद पडले आहे, त्यामुळे या घडयाळाला आता चावी देवूनही उपयोग नाही. याचा सिडकोवासियांनी विचार करावा असे ते यावेळी म्हणाले. कुठल्याही भुलथापांना बळी न पडता शहर व परिसराच्या सर्वांगिन विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी रहा असे आवाहन त्यांनी केले. सरकारची तीन वर्ष झाली कहाँ गये अच्छे दिन असा सवाल करीत, सर्वसामान्यांची दिशाभूल करणाºयांना आता थारा देवू नका असे आवाहनही चव्हाण यांनी केले. शहर विकासासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आज शहराचे चित्र बदलताना दिसत असल्याचे सांगत, विकासाचा हा प्रवाह पुढे घेवून जाण्यासाठी काँग्रेसला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस पक्ष सोडला, तर अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणे शक्य झालेच नाही, असे नमूद करून काही राजकीय पक्षाच्या लोकांना तर माणसे पकडून आणून उभे करण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी हाणला.भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केले नसताना कांही नेते भाजपचे असल्याच्या तोºयात वावरत आहेत, त्यामुळे मतदारांनी त्यांच्या थापांना बळी पडू नये, असे नमूद करून लोकांचा आजही आपल्या काँग्रेस पक्षावर विश्वास कायम असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. २०१९ मध्ये राज्यात आणि देशात ही सत्ता पालटल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.