शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत काँग्रेसला पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:32 IST

सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : सद्या कार्यरत असलेल्या सत्ताधाºयांकडून भारतीय लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आपण त्यांचा हा प्रयत्न कदापी यशस्वी होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.नांदेड - वाघाळा मनपाच्या हद्दीतील सिडको- हडको व वाघाळा परिसरातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते हडको येथील शिवाजी उद्यानाच्या प्रांगणात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे उमेदवार डॉ. करूणा जमदाडे, श्रीनिवास जाधव, मंगला गजानन देशमुख, ललिता मुकुंद बोकारे व विनय विश्वाभंर पाटील- गिरडे यांच्यासह गणपतराव तिडके, माधवराव पांडागळे, नारायणराव जाधव व प्रसिद्ध गायक अनिरूद्ध बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा. चव्हाण म्हणाले, भाजप तसेच शिवसेना हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.‘राष्टÑवादी’ काँग्रेसचे घडयाळ तर सद्या बंद पडले आहे, त्यामुळे या घडयाळाला आता चावी देवूनही उपयोग नाही. याचा सिडकोवासियांनी विचार करावा असे ते यावेळी म्हणाले. कुठल्याही भुलथापांना बळी न पडता शहर व परिसराच्या सर्वांगिन विकासासाठी काँग्रेसच्या पाठीशी रहा असे आवाहन त्यांनी केले. सरकारची तीन वर्ष झाली कहाँ गये अच्छे दिन असा सवाल करीत, सर्वसामान्यांची दिशाभूल करणाºयांना आता थारा देवू नका असे आवाहनही चव्हाण यांनी केले. शहर विकासासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच आज शहराचे चित्र बदलताना दिसत असल्याचे सांगत, विकासाचा हा प्रवाह पुढे घेवून जाण्यासाठी काँग्रेसला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.काँग्रेस पक्ष सोडला, तर अन्य कोणत्याही राजकीय पक्षाला सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणे शक्य झालेच नाही, असे नमूद करून काही राजकीय पक्षाच्या लोकांना तर माणसे पकडून आणून उभे करण्याची वेळ आली असल्याचा टोला त्यांनी हाणला.भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केले नसताना कांही नेते भाजपचे असल्याच्या तोºयात वावरत आहेत, त्यामुळे मतदारांनी त्यांच्या थापांना बळी पडू नये, असे नमूद करून लोकांचा आजही आपल्या काँग्रेस पक्षावर विश्वास कायम असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. २०१९ मध्ये राज्यात आणि देशात ही सत्ता पालटल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.