शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
7
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
8
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
9
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
10
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
11
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
12
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
13
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
14
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
15
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
16
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
17
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
18
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
19
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
20
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:03 IST

काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार

औरंगाबाद : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रुपये देण्याच्या आणि कलम १२४ (अ)१ रद्द करण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. सोमवारी गजानन महाराज मंदिर चौकातील जाहीर सभेत काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी पंजोबा, आजी, आई आणि नातू (काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी) हे एकच घोषणा वारंवार करीत आहेत. ६० वर्षांपासून ते व काँग्रेस एकच नारा देत आहेत, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. उमेदवार खैरे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, आ.प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून १ रुपया जर खाली सोडला तर ८५ पैसे दलाल खातात. मोदींनी ही सगळी खाबूगिरी बंद केली आहे. ते गरिबी हटविण्यासाठी काम करीत आहेत. मोदींनी काळा पैसा आणायचा आणि तो काँगे्रसने ७२ हजार रुपये देऊन वाटायचा, असे ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ‘खुद खाऊंगा ना दुसरों को खाने दुंगा’ याप्रमाणे काम करीत ३४ कोटी गरिबांना जन-धन योजनेत बँकखाते दिले. खात्यावर ८० हजार कोटी रुपये दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी शाहनवाज, आ. सावे, आ.  शिरसाट यांची भाषणे झाली.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासनस्मार्ट सिटीचा दर्जा या शहराला दिला. १२५ कोटी यापूर्वी शहरातील रस्त्यासाठी दिले आहेत. आजवर एवढा निधी कधी तरी औरंगाबाद शहराला मिळाला काय, येथील रस्ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत निधी देत राहू. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जेवढा लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभेत दिले. जालना-औरंगाबाद इंडस्ट्रियल हब होणार असल्याचे ते म्हणाले.

‘तो’ अपक्ष अफवा पसरवतोयउमेदवार खा.खैरे यांनी अपक्ष उमेदवार (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) आणि एमआयएमचे उमेदवार आ.इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. मला निवडून द्या, मी भाजपला पाठिंबा देईल असे म्हणून एक अपक्ष उमेदवार अफवा पसरवतोय. तो त्याच्या घरच्यांचा नाही, इतरांचा काय होणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्याचे सांगून ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम लटकले; परंतु येत्या एक वर्षात ते काम पूर्ण करू. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019