शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

६० वर्षांपासून काँग्रेस एकच नारा देत आहे, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नाही: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:03 IST

काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार

औरंगाबाद : काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गरिबांना ७२ हजार रुपये देण्याच्या आणि कलम १२४ (अ)१ रद्द करण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली. सोमवारी गजानन महाराज मंदिर चौकातील जाहीर सभेत काँग्रेसच्या गरिबी हटाव या नाऱ्याचा खरपूस समाचार घेत त्यांनी पंजोबा, आजी, आई आणि नातू (काँग्रेस अध्यक्ष खा.राहुल गांधी) हे एकच घोषणा वारंवार करीत आहेत. ६० वर्षांपासून ते व काँग्रेस एकच नारा देत आहेत, तरीही त्यांच्याकडून गरिबी हटत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. उमेदवार खैरे यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसैन, आ.अतुल सावे, आ.संजय शिरसाट, आ.प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर आदींची यावेळी उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते केंद्रातून १ रुपया जर खाली सोडला तर ८५ पैसे दलाल खातात. मोदींनी ही सगळी खाबूगिरी बंद केली आहे. ते गरिबी हटविण्यासाठी काम करीत आहेत. मोदींनी काळा पैसा आणायचा आणि तो काँगे्रसने ७२ हजार रुपये देऊन वाटायचा, असे ‘आयजीच्या जिवावर बायजी उधार’काँग्रेसचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी ‘खुद खाऊंगा ना दुसरों को खाने दुंगा’ याप्रमाणे काम करीत ३४ कोटी गरिबांना जन-धन योजनेत बँकखाते दिले. खात्यावर ८० हजार कोटी रुपये दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी शाहनवाज, आ. सावे, आ.  शिरसाट यांची भाषणे झाली.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासनस्मार्ट सिटीचा दर्जा या शहराला दिला. १२५ कोटी यापूर्वी शहरातील रस्त्यासाठी दिले आहेत. आजवर एवढा निधी कधी तरी औरंगाबाद शहराला मिळाला काय, येथील रस्ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत निधी देत राहू. पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जेवढा लागेल तेवढा निधी केंद्र आणि राज्य शासनाकडून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभेत दिले. जालना-औरंगाबाद इंडस्ट्रियल हब होणार असल्याचे ते म्हणाले.

‘तो’ अपक्ष अफवा पसरवतोयउमेदवार खा.खैरे यांनी अपक्ष उमेदवार (हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता) आणि एमआयएमचे उमेदवार आ.इम्तियाज जलील यांच्यावर आरोप केले. मला निवडून द्या, मी भाजपला पाठिंबा देईल असे म्हणून एक अपक्ष उमेदवार अफवा पसरवतोय. तो त्याच्या घरच्यांचा नाही, इतरांचा काय होणार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी लोकसभेत मुद्दा उपस्थित केल्याचे सांगून ते म्हणाले, समांतर जलवाहिनीचे काम लटकले; परंतु येत्या एक वर्षात ते काम पूर्ण करू. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019