शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मांगीरबाबांच्या चरणी गर्दी...

By admin | Updated: April 27, 2016 00:32 IST

औरंगाबाद : ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत हजारो भाविक शेंद्र्यातील मांगीरबाबांच्या चरणी नतमस्तक होत होते.

औरंगाबाद : ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत हजारो भाविक शेंद्र्यातील मांगीरबाबांच्या चरणी नतमस्तक होत होते. मात्र, यात्रेच्या पहिल्या दिवशी भक्तांची संख्या रोडावलेली दिसली. यात्रेवर दुष्काळाचा परिणाम झाल्याचे देवस्थानाच्या वतीने सांगण्यात येत होते. मांगीरबाबांची यात्रा शेंद्रा गावात मंगळवारी सुरू झाली. तत्पूर्वी सोमवारी मध्यरात्री १२ वाजता महापौर त्र्यंबक तुपे यांच्या हस्ते मांगीरबाबांची आरती झाली. यावेळी भाजपचे उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक रात्रीच शेंद्र्यात मुक्कामी येऊ लागले होते. पहाटेपासूनच नवस केलेले भाविक अनवाणी मांगीरबाबाच्या दर्शनाला जाताना दिसून आले. नवस केलेल्या महिलांनी पुरुषांच्या डोक्यावर चारही बाजंूनी कापड धरले होते. डफ वाजवीत भाविक पायी दर्शनाला जात होते. अशा पद्धतीने मिरवणूक काढून दिवसभर हजारो भाविक मांगीरबाबांच्या दर्शनाला येत होते. गावाच्या चोहोबाजूने दिवसभर डफांचा आवाज घुमत होता. मांगीरबाबांच्या मंदिर परिसरात मोठा मंडप टाकण्यात आला आहे. यामुळे भाविकांना कडक उन्हात सावलीचा आधार होता. मांगीरबाबांच्या मूर्तीसमोर लोखंडी जाळी बसविण्यात आली असून, मांगीरबाबांच्या मूर्तीसमोर भाविक नतमस्तक होत होते. कडेवरील बाळांना देवाचे दर्शन घ्यायला लावत होते. देवाचे दर्शन झाल्यावर ‘मांगीरबाबा की जय’ असा जयघोष करीत भाविक आनंदोत्सव साजरा करीत साखर, रेवड्या उधळत होते. खाली पडलेल्या रेवड्या घेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू होती. या रेवड्या प्रसाद म्हणून जपून ठेवत सहपरिवाराला खायला दिल्या जात होत्या. देवस्थानाच्या पाठीमागील बाजूस मांगीरबाबाची गढी आहे. गढीवर चढून जात भाविक गढीचे दर्शन घेऊन येथील येथील माती मस्तकाला लावत होते. यात्रेतील सर्व वातावरण मांगीरबाबामय झाले होते. मंदिराच्या मंडपात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. पाण्याचे पाऊच दिले जात होते. गळ टोचून घेण्याची प्रथा अजूनही येथे कायम होती. दिवसभरात शेकडो लोकांनी गळ टोचून घेतले होते. हनुमानाच्या मंदिरापासून गळ टोचून भाविक मांगीरबाबाच्या मंदिरापर्यंत जात होते. लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. तरी पण आज भाविक गळ टोचून घेताना दिसून आले. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गळ टोचणाऱ्यांची संख्या घटली आहे, हे विशेष. मंदिराच्या बाजूलाच देवस्थान समितीचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. येथे बसून अध्यक्ष भास्करराव कचकुरे, सुरेश नाईकवाडे, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, कडुबा कुटे, किशोर शेजूळ आदी भाविकांना मार्गदर्शन करीत होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर शेंद्रा येथे देवस्थान परिसरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याद्वारे यात्रेवर नजर ठेवली जात आहे. सरपंच शुभांगी तांबे, उपसरपंच पांडुरंग कचकुरे, सदस्य- रमेश जाधव, रेखा तांबे, नुरजहाँ पठाण, शिवगंगा कचकुरे, किरणबाई कचकुरे, रेखा नवगिरे, भास्करराव कचकुरे, रवींद्र तांबे, पोलीस पाटील अफसर पठाण आदी परिश्रम घेत आहेत. यात्रा भरली, पण...शेंद्रा गावात शिरताच नजरेस मोठी यात्रा भरलेली दिसून येते. लहान-मोठी खेळणी, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल, रहाटपाळणे, विविध खेळणी उभारण्यात आली आहे. मात्र, यात्रेत दरवर्षीप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. उन्हाचा पारा चढल्याने दुपारी गर्दी ओसरली होती. सायंकाळी गर्दीने परिसर फुलला, पण दुष्काळाचा परिणाम यात्रेवर स्पष्टपणे जाणवत होता. येथे रेवड्याचे शेकडो स्टॉल लागले आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदा रेवड्याची उधळण कमी झाली. याविषयी रेवडी विक्रेता अशोक तमखाने यांनी सांगितले की, दरवर्षी यात्रेच्या पहिल्याच दिवशी माझ्याकडील ७० ते ८० किलो रेवड्या विक्री होत असत. आज सायंकाळपर्यंत ३४ किलोच रेवड्या विक्री झाल्या. यावरून दुष्काळाचा यात्रेला किती फटका बसला असेल, याचा अंदाज येऊ शकतो. अनेक स्टॉलवाले दिवसभर ग्राहकांची प्रतीक्षा करताना दिसून आले. गेल्या वर्षीपेक्षा ४० टक्क्यांनी यंदा भाविकांची संख्या रोडावली आहे, अशी माहिती देवस्थान समितीने दिली.