शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

प्रशासकीय नियोजनाअभावी शहरात जीवनावश्यक वस्तूपुरवठ्यात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 19:29 IST

मागील ६ दिवसांपासून फळ, भाजीपाला अडत बाजार, भाजीमंडई बंद असल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप अडत्यांनी केला आहे

ठळक मुद्दे प्रशासनाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे शहरवासीयांमध्ये संभ्रमभाजीपाला, फळे सडून झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीचे कुणालाच सोयरसुतक नाही 

औरंगाबाद : कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि बाजारपेठेत फळ,  भाजीपाला व किराणा खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यात प्रशासनाला सतत अपयश येत आहे. मुळात प्रशासनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून  सकाळी एक, रात्री उशिरा एक, असे वेगवेगळे आदेश काढण्यात येत असल्याने संभ्रम निर्माण होत आहे. त्यात निर्णय घेणा-या व अंमलबजावणी करणा-या यंत्रणेत ताळमेळ नसल्याने, गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.   

शहरात कोरोनाबाधितांची संख्या ११०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. यामुळे परिस्थिती बघून  प्रशासनाला निर्णय घ्यावे लागत आहे; पण निर्णय घेताना  विभागीय आयुक्त एक आदेश काढत आहेत, जिल्हाधिकारी दुसरा आदेश काढत आहेत, तिसरा आदेश पोलीस आयुक्त काढत आहे, तर चौथा आदेश मनपा आयुक्त काढत आहेत. यामुळे उद्या दुकाने सुरू राहणार की बंद राहणार याविषयी संभ्रम निर्माण होत आहे. व्यापारी प्रतिनिधींनी आरोप केला की, मुळात प्रशासनात एकवाक्यता नसल्याने संभ्रम आणखी वाढत आहे. प्रशासनाने जर भाजीपाला, फळ विक्री व किराणा विक्रीला दररोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी दिली असती, तर बाजारपेठेत गर्दी झालीच नसती. प्रशासन रात्री उशिरा आदेश काढून उद्यापासून किराणा, भाजीपाला विक्री बंद करते. यामुळे फळ व भाजीपाल्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

मागील ६ दिवसांपासून फळ, भाजीपाला अडत बाजार, भाजीमंडई बंद असल्याने सुमारे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप अडत्यांनी केला आहे, तर काहीच नियोजन नसल्याने व मैदानावर तात्पुरता भरविण्यात येणारा भाजी बाजारही स्थानिकांच्या विरोधामुळे बंद पडल्याने गुरुवारी बाजार उघडल्यावर सर्व गर्दी जाधववाडीत होईल, अशी भीती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी व्यक्त केली, तर किराणा होलसेल व किरकोळ दुकानाचा वेळ दुपारपर्यंत ठेवल्याने खरेदीसाठी एकच गर्दी जुन्या मोंढ्यात उसळणार आहे. सलग बाजारपेठ सुरू ठेवून  सायंकाळी ५ वाजेपर्यंत विक्रीला परवानगी दिली, तर ग्राहकांमध्ये किराणा न मिळण्याची भीती कमी होईल व बाजारातील गर्दी कमी होईल. मात्र, प्रशासन व्यापारी संघटनांना विचारात न घेताच आदेश काढत असल्याने गोंधळ निर्माण होत असल्याचेही व्यापारी प्रतिनिधींनी सांगितले. 

प्रशासन चर्चा करीत नाहीशेतक-यांचे हित लक्षात घेता बाजार समितीमधील सर्व अडत व्यवहार सुरू ठेवा, असा आदेश पण संचालकांनी काढला आहे, तर स्थानिक प्रशासन कधी वेळेचे बंधन घालते, तर कधी अचानक व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश काढते. आदेश देण्यापूर्वी बाजार समिती सभापती, संचालकांशी चर्चा केली जात नसल्याने सर्व गोंधळ उडतो.  किरकोळ भाजीपाला विक्रीची मंडई भरविण्याची जबाबदारी मनपाची आहे; त्यांचे शहरात ४१ ठिकाणी मंडई भरविण्याचे नियोजन बारगळले, त्यामुळे जाधववाडीत  गर्दी उसळत आहे.  -राधाकिसन पठाडे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

प्रशासनात ताळमेळाचा अभावप्रशासनात ताळमेळाचा अभाव असल्याने बाजारपेठेसंदर्भातील कोणताही निर्णय यशस्वी होत नाही. किराणा दुकान सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत उघडी ठेवली, तर ग्राहकांमधील बंदची भीती कमी होऊन ते धान्यसाठा करणार नाहीत. यासाठी बाजारपेठेसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी व्यापारी संघटनेशी प्रशासनाने चर्चा करावी. -लक्ष्मीनारायण राठी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

 नुकसान कोण भरून देणार?रमजान महिन्यामुळे व्यापाºयांनी मोठ्या प्रमाणात फळे मागविली आहेत. मात्र, प्रशासनाने पूर्वसूचना न देता, अचानक रात्री निर्णय घेत फळ, भाजीपाला विक्री बंद केली. मागील ५ दिवसांत फळे, भाजीपाला खराब होऊन ५० लाखांचे नुकसान झाले. हे नुकसान कोण भरून देणार. ज्या किरकोळ विक्रेत्यांकडे फळे शिल्लक होती, त्यांनी दुप्पट भावात विकून ग्राहकांना लुटले. - इसा खान,  अध्यक्ष, फळ, भाजीपाला अडत असोसिएशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद