शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

रासायनिक खतांच्या दरवाढीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2021 4:06 AM

भराडी : सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी यंदा कोरोनाच्या संकटातही मान्सूनपूर्व शेतीकामासाठी वेगाने सरसावला आहे. यातच ...

भराडी : सातत्याने नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेला शेतकरी यंदा कोरोनाच्या संकटातही मान्सूनपूर्व शेतीकामासाठी वेगाने सरसावला आहे. यातच खतांच्या किमतीत तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे तुणतुणे विविध खत कंपन्याकडून वाजविले जात आहे. तसे वृत्तदेखील शेतकऱ्यांपर्यंत आले. मात्र, केंद्र सरकारकडून खतांच्या किमतीत कोणतीही वाढ नसल्याचा दावा करण्यात आला. या प्रकाराने शेतकरी मात्र संभ्रमात पडलेला असून अनेक शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात जाऊन जुन्या साठ्यातून खतांची खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.

रासायनिक खतांच्या किमतीत दरवाढ झाली तर निश्चितच ती शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते; परंतु दरवर्षी शेतकरी निसर्गाच्या सुल्तानी संकटाला बळी पडतो. गेल्यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली. पुन्हा रबी पिकांत अवकाळी पावसाने नुकसान केले. आता खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने शेतकऱ्यांनी झाले गेले विसरून नव्याने शेती मशागतीस सुरुवात केली; पंरतु खतांच्या किमतीत यावर्षी भरघोस दरवाढ करण्यात आल्याचे वृत्त मिळाल्याने शेतकरी जुन्या साठ्यातील कमी किमतीचे खत खरेदीसाठी गर्दी करू लागला आहेत.

खताची दरवाढ नुकसानकारक

खताची दरवाढ झाली असल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. एकीकडे नैसर्गिक संकटामुळे अपेक्षित उत्पादन हाती लागत नाही. दरवर्षी खर्च अधिक अन् उत्पादन कमी अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने शेतकरी कंगाल झाले आहेत. यातच खतांच्या किमतीत दरवाढ झाली तर ती आम्हा लोकांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहेत.

- विजय काळे, शेतकरी, पिरोळा.