शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तीन तालुक्यांचा आढावा पूर्ण

By admin | Updated: January 13, 2016 23:59 IST

हिंगोली : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या आढाव्यासाठी मागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बैठकांना तात्पुरता विराम मिळाला आहे.

हिंगोली : रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या आढाव्यासाठी मागील तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या बैठकांना तात्पुरता विराम मिळाला आहे. तीन तालुक्यांचा आढावा झाला असून आणखी दोन तालुक्यांचे काम बाकी आहे.हिंगोली, कळमनुरी व औंढा तालुक्यांचा मागील तीन दिवसांत पूर्ण करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड, प्रभारी कार्यकारी अभियंता के. एस. हिरेमठ यांची उपस्थिती होती. तर तालुकानिहाय गटविकास अधिकारी विशाल राठोड, लक्ष्मण सुरुशे, पवार, उपअभियंता के. एम. संद्री यांची उपस्थिती होती.बुधवारी औंढा तालुक्यातील ३६ गावांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये फेब्रुवारीत बहुतांश कामे पूर्ण करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात जानेवारी महिन्यातच ११ गावे, फेब्रुवारीत ११ गावे, मार्चमध्ये १, एप्रिलमध्ये ४ तर जूनमध्ये दोन कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. त्या-त्या ठिकाणचे काम किती शिल्लक राहिले, यावरून हा कालावधी कमी अधिक प्रमाणात राहणार आहे. तर नव्या कामांना आणखी मुदत दिली आहे. कळमनुरी तालुक्यातील ४0 योजनांचा आढावा झाला. यात जानेवारीत १६, फेब्रुवारीत- २१, जून, डिसेंबरपर्यंत प्रत्येकी १ काम पूर्ण करण्यास सांगितले. एक काम नवीन आहे. काही ठिकाणी समितीत वाद असला तरी महावितरणकडून जोडणी न मिळाल्याने किंवा कोटेशनच स्वीकारले जात नसल्यानेही योजना ठप्प असल्याची उदाहरणे आहेत. समित्यांनी किरकोळ कामे बाकी ठेवल्याने हस्तांतरण न केलेली गावेही मोठ्या संख्येत आहेत. या गावांनी आता योजना पूर्ण करून न दिल्यास वसुली किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)