शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत आज आणि उद्या पूर्ण लॉकडाऊन; परवानगी असलेल्या सेवाच सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 12:45 IST

lockdown in Aurangabad प्रशासनाने सूट दिलेल्या आणि सशर्त परवानगी दिलेल्या यंत्रणाच या काळात सुरू राहणार आहेत

ठळक मुद्देशुक्रवारी ६१७ कोरोनाबाधितांची भर, ६ मृत्यूशनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अशंत: तर आठवड्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या कळात सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन सुरळीत राहील. प्रशासनाने सूट दिलेल्या आणि सशर्त परवानगी दिलेल्या यंत्रणाच या काळात सुरू राहणार आहेत. संयुक्तपणे सर्व प्रशासकीय यंत्रणा या काळात एकत्रित काम करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

बुधवारी मुख्य सचिव आणि केंद्रीय पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय पथकाने देखील प्रशासनाला सतर्कतने काम करण्याच्या सूचना केल्या आहे. येणाऱ्या पंधरवड्यात सक्षमतेने काम करावे लागणार असून नागरिकांनादेखील स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे.

या संस्थांना मुभा राहीलशनिवार आणि रविवार १०० टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात वैद्यकीय सेवा, वृत्तपत्र, मीडिया सेवा, दूध व्रिक्री व पुरवठा इ. भाजीपाला विक्री व पुरवठा, फळेविक्री व पुरवठा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी, सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा, बांधकामे, उद्योग व कारखाने, किराणा दुकाने, मांसविक्री दुकाने, वाहन दुरुस्ती दुकाने, गॅरेज, वर्कशॉप, पशुखाद्य दुकाने, बँक व पोस्ट सेवा सुरू राहतील.

या संस्था बंद असतीलदुकाने व बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट (फक्त होम डिलीव्हरीला मुभा ), खासगी कार्यालय, आस्थापना बंद असतील.

शुक्रवारी ६१७ कोरोनाबाधितांची भर, ६ मृत्यूजिल्ह्यात कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ सुरूच असून, शुक्रवारी तब्बल ६१७ नव्या बाधितांची भर पडली, तर सहा बाधितांचा मृत्यू झाला. दिवसभरात उपचार पूर्ण झाल्याने मनपा हद्दीतील २०८ तर ग्रामीण भागातील ७० जणांना सुट्टी देण्यात आली.आजपर्यंत जिल्ह्यात ५५ हजार ९५८ बाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ५० हजार १६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत १,३२६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या विविध रुग्णालयांत ४ हजार ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद