शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तची कामे जूनअखेर पूर्ण करा

By admin | Updated: April 4, 2016 00:33 IST

जालना : पाणलोट व्यवस्थापन हा जलयुक्त शिवार अभियानाचा पाया आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी मृद संधारण जल संधारण तसेच

जालना : पाणलोट व्यवस्थापन हा जलयुक्त शिवार अभियानाचा पाया आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी मृद संधारण जल संधारण तसेच जमिनीची धूप थांबविण्यासाठी पाणलोट व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबर गतवर्षातील जलयुक्त शिवार अभियानाची प्रलंबित असलेली कामे जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, खरीप हंगाम या विषयावर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना जैन बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, विभागीय कृषी सह संचालक रमेश भताने, अधीक्षक कृषी अधिकारी (रोहयो) विलास रेणापूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दरशथ तांभाळे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी लोणारे, कृषी उपायुक्त सुर्यकांत हजारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अपर जिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश जोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जैन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे. जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी गाविनहाय सूक्ष्म आराखडा तयार करुन दर्जेदार कामे होतील याकडे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज जैन यांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी मार्गदर्शन करून कामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे व उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश जोशी यांनी पॉवर पाँईटच्या माध्यमातून विषयनिहाय माहिती दिली. यावेळी माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या निधनाबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.