शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

१५ जुलैपूर्वी उद्दिष्ट पूर्ण करा

By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ७९७ कोटी रूपयांच्या पीक कर्जाचे वाटपांचे उद्दिष्ट असून, १५ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीतून दिले. जिल्ह्यातील पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बँकांचे व्यवस्थापन, अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक, बँक आॅफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक राजकिरण भोईर, जिल्हा उपनिबंधक डॉ.अशोक खरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घटगे, जि.प.चे कृषी अधिकारी गंजेवार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक पी.जी. भागवतकर, अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक यू. आर. होळकर, जि.म. स. बँकेचे नलावडे उपस्थित होते.जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख खातेदार शेतकरी आहेत. परंतु एक लाख ८४ खातेदारांनाच पीक कर्जाचे वाटप केले जाते. दरवर्षी पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते, परंतु, नवीन शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. नव्याने पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा निबंधक कार्यालयाने तयार करून बँकाकडे द्याव्यात, जेणे करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज देता येईल, अशा सूचना केल्या. १ जुलै २०१४ नंतर प्रामुख्याने जिल्ह्यातील २५ टक्के खातेदारांना नव्याने कर्ज द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.आजपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी यावर्षीचे सुमारे ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केले आहे. परंतु कर्ज वाटपाचा वेग वाढला पाहिजे. बँकांनी पीक कर्ज मेळाव्यांचे आयोजन करावे, असेही टोपे यांनी नमूद केले.जिल्ह्याच्या पत आराखड्यात पीक कर्जासोबतच इतर कर्जाचे उद्दिष्टही निश्चित करण्यात येते. मात्र यातील कृषीपूरक साधने, अवजारे, विहीर, पाइपलाईन, ट्रॅक्टर आदीसाठी मात्र फारच कमी कर्जपुरवठा केला जातो. यासाठी कर्जाचा पुरवठा करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले. बँकांनी या आवाहनास प्रतिसाद देत कर्ज देण्याचे मान्य केले.यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट २४ टक्क्यांनी वाढवून ७९७ कोटी रूपयांचे करण्यात आले आहे. गतवर्षी पीक कर्जवाटपात विभागातून प्रथम क्रमांक पटकावला होता. उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच एकूण ८०० कोटी ६५ लाख रूपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात होते. यात खरिपासाठी ६२४ कोटी ५१ लाख तर रबीसाठी १७६ कोटी १४ लाख रूपयांचे पीक वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)शेतकरी, ग्राहकांना सन्मानाची वागणूक देण्याच्या सूचनाबँकांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना अतिशय वाईट वागणूक मिळत आहे, अशी खंत व्यक्त करून पालकमंत्री टोपे यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर्तनात, वागणुकीत बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले. बँकेत येणाऱ्या ग्राहकांना आणि शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, त्यांना विना व्यत्यय सेवा देण्यात यावी, त्याकरिता बँकांनी लोकाभिमुख होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.बँकांच्या कामासाठी दलालाला पैसे दिल्याशिवाय कामे होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी पैसे मोजावे लागतात, या गोष्टी त्वरीत थांबविण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.