शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

अनियमित आणि भरपेट जेवणामुळे मुलांमध्ये स्थूलता वाढण्याच्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:02 IST

औरंगाबाद : ग्रामीण आणि शहरातील झोपडपट्टी भागात कुपोषित मुले जशी नजरेस पडतात तशीच अनेक वसाहतीत अतिपोषण झाल्यामुळे स्थूल ...

औरंगाबाद : ग्रामीण आणि शहरातील झोपडपट्टी भागात कुपोषित मुले जशी नजरेस पडतात तशीच अनेक वसाहतीत अतिपोषण झाल्यामुळे स्थूल झालेली मुले, मुली पहायला मिळतात. स्थूलता असलेल्या लहान मुलांमध्ये चिडचिडपणा आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याकडे कल दिसतो. लठ्ठपणा टाळण्यासाठी पालकांनी मुलांच्या खाण्यापिण्याची वेळ निश्चित करावी, त्यांच्याकडून व्यायाम करून घ्यावा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ यांनी दिला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या बाराशेहून अधिक असल्याचे समोर आले. ग्रामीण भागात जसे कुपोषित बालक आढळून येतात, तशी ती शहरातही असतात. कुपोषित बालकांना अंगणवाडीसेविकामार्फत सकस आहार पुरविला जातो. त्यांची वजन आणि उंचीचे मोजमाप घेतले जाते. त्यांना अतिकुपोषण श्रेणीतून बाहेर काढण्यासाठी शासकीय यंत्रणा दिवसरात्र काम करते. कुपोषण समस्येसारखेच अतिपोषणामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचा आजार पाहायला मिळताे. दीड ते पावणेदोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. घरीच असलेल्या मुलांना आता कुठे खेळायला मैदाने खुली करण्यात आली. या कालावधीत मुले ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन क्लास संपल्यानंतर दिवसभर मोबाइलवर गेम खेळत असत. फास्ट फूड खाणे, रात्री उशिरा झोपणे आदी सवयी बालकांना लागल्या. याचे मुलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले. अनियंत्रित खाणेपिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला. लठ्ठ झालेल्या मुलांमध्ये चिडचिडपणा, अभ्यासाचा कंटाळा आदी लक्षणे दिसतात.

कोट...

कोविड संसर्ग सुरू झाल्यापासून लहान मुलेमुली घरातच आहेत. त्यामुळे मुलांच्या जेवणाच्या वेळा निश्चित करा. सूर्यनमस्कार, प्राणायाम अथवा खेळण्यासाठी त्यांना घराबाहेर मैदानावर न्यावे.

- डॉ. रेणुका बोराळकर, बालरोगतज्ज्ञ

--------------------

लहान मुलांमधील स्थूलपणा कमी करणे आवश्यक असते. याकरिता पालकांनी पुढाकार घेऊन मुले, मुली सकाळी ६ वाजता झोपेतून उठतील आणि रात्री ९ वाजता झोपतील, याची काळजी घ्यावी. शिवाय तेलकट पदार्थ जास्त खाण्यास देऊ नयेत. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि अन्य मैदानी खेळ खेळायला घेऊन जावे.

- नागेश पाटील, वैद्य