शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! पदवी निकालाबाबतच्या तक्रारी महाविद्यालयातच करा

By योगेश पायघन | Updated: August 8, 2022 20:17 IST

परीक्षा, मूल्यमापन मंडळाचे आदेश : विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नका, अर्ज स्वीकारणार नाही

औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने पदवी परीक्षांचा निकाल जाहीर केला. घोषित झालेल्या निकालातील त्रुटी, तक्रारींची माहिती एकत्रितपणे पुढील १० दिवसांत ई मेलद्वारे नेमून दिलेल्या कक्षाला कळवा. विद्यार्थ्यांना विद्यापीठात पाठवू नका. विद्यापीठात विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे परिपत्रक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. गणेश मंझा यांनी काढले आहे.

उर्वरित इतर पदवी व पदव्युत्तर पदवी निकाल घोषित करण्याची प्रक्रिया विद्यापीठ स्तरावरून सुरू आहे. टप्प्या टप्प्याने उर्वरित निकाल जाहीर होतील. निकाल विद्यार्थ्यांनी आधी समजून घ्यावा. चाॅईस बेस ग्रेडींग सिस्टीम विद्यार्थ्यांना समजलेली दिसत नाही. त्यामुळे निकालात विद्यार्थ्यांना त्रुटी वाटत असल्यास महाविद्यालयाशी संपर्क साधावा. महाविद्यालयांना त्रुटी, तक्रारी, राखीव निकालांची माहिती दिलेल्या नमुन्यात ९ विविध कक्षांच्या इमेलवर पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठात तक्रारींसाठी येऊ नये. त्यांनी महाविद्यालयात, संबंधित विभागात आपले म्हणणे कळवावे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी, त्रुटी, अडचणींचे निरसन करून ते संबंधित महाविद्यालयाला कळवण्यात येईल. सर्व विभागप्रमुख, शैक्षणिक विभाग, विद्यापीठ परिसर व उपपरिसर तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य यांना देण्यात परिपत्रकाद्वारे सूचनाही दिल्या आहेत, असे डाॅ. मंझा म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद