शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नुकसानभरपाई खात्यावर; केंद्रीय पथक गेलं शेतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:29 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार या पाहणीमुळे घडला असून, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत चार गावांत पथकाने भेटी देत पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण पाहून जालन्याकडे प्रस्थान केले.बोंडअळीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी १२२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचा पहिला हप्ता ३२५ कोटी ६० लाख रुपये आला असून, शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.बोंडअळीच्या नुकसानीपोटी भरपाई म्हणून एकूण ४०७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. बिम्स प्रणालीअंतर्गत ३२५ कोटी ६० लाख रुपये जमा होतील, उर्वरित रक्कम नंतर जमा होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकूण १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपयांचे मदत अनुदान बोंडअळीग्रस्त शेतक-यांना देण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला हप्ता कोषागार कार्यालयाला प्राप्त झाला आहे.शेतकºयांना लागवडीयोग्य पिके, तंत्रज्ञान, औषधी फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी, याबाबत जनजागृती करावी. शेतक-यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिका-यांना केल्या.तालुक्यातील गाढेजळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्य कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, सोमनाथ जाधव, तहसीलदार सतीश सोनी, संगीता चव्हाण, नंदिनी गोकटे, आर.डी. देशपांडे, के. डब्ल्यू. देशकर, चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीनिवासन, कृषी अधीक्षक संजीव पडवळ, कृषी विकास अधिकारी गंजेवार, कृषी सेवक, तालुका कृषी अधिका-यांची उपस्थिती होती.पथकाने शेतक-यांशी साधला संवादगाढेजळगाव येथे शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्याशी संवाद साधून नुकसानीची केंद्रीय पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली, तसेच तुकाराम मारोती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी याबाबत आलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला, तसेच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील हनुमान मंदिरात भीमराव भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्याशी कापूस पीक लागवड, पीकविमा याबाबत विचारपूस केली.

टॅग्स :cottonकापूसGovernmentसरकार