शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

नुकसानभरपाई खात्यावर; केंद्रीय पथक गेलं शेतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:29 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार या पाहणीमुळे घडला असून, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत चार गावांत पथकाने भेटी देत पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण पाहून जालन्याकडे प्रस्थान केले.बोंडअळीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी १२२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचा पहिला हप्ता ३२५ कोटी ६० लाख रुपये आला असून, शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.बोंडअळीच्या नुकसानीपोटी भरपाई म्हणून एकूण ४०७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. बिम्स प्रणालीअंतर्गत ३२५ कोटी ६० लाख रुपये जमा होतील, उर्वरित रक्कम नंतर जमा होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकूण १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपयांचे मदत अनुदान बोंडअळीग्रस्त शेतक-यांना देण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला हप्ता कोषागार कार्यालयाला प्राप्त झाला आहे.शेतकºयांना लागवडीयोग्य पिके, तंत्रज्ञान, औषधी फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी, याबाबत जनजागृती करावी. शेतक-यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिका-यांना केल्या.तालुक्यातील गाढेजळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्य कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, सोमनाथ जाधव, तहसीलदार सतीश सोनी, संगीता चव्हाण, नंदिनी गोकटे, आर.डी. देशपांडे, के. डब्ल्यू. देशकर, चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीनिवासन, कृषी अधीक्षक संजीव पडवळ, कृषी विकास अधिकारी गंजेवार, कृषी सेवक, तालुका कृषी अधिका-यांची उपस्थिती होती.पथकाने शेतक-यांशी साधला संवादगाढेजळगाव येथे शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्याशी संवाद साधून नुकसानीची केंद्रीय पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली, तसेच तुकाराम मारोती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी याबाबत आलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला, तसेच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील हनुमान मंदिरात भीमराव भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्याशी कापूस पीक लागवड, पीकविमा याबाबत विचारपूस केली.

टॅग्स :cottonकापूसGovernmentसरकार