शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

नुकसानभरपाई खात्यावर; केंद्रीय पथक गेलं शेतावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:29 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी कापसाच्या पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाने बुधवारी जिल्ह्यातील काही शेतक-यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. ‘वरातीमागून घोडे’ असा प्रकार या पाहणीमुळे घडला असून, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत चार गावांत पथकाने भेटी देत पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण पाहून जालन्याकडे प्रस्थान केले.बोंडअळीच्या नुकसानीच्या भरपाईसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी १२२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचा पहिला हप्ता ३२५ कोटी ६० लाख रुपये आला असून, शेतक-यांच्या थेट खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे.बोंडअळीच्या नुकसानीपोटी भरपाई म्हणून एकूण ४०७ कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. बिम्स प्रणालीअंतर्गत ३२५ कोटी ६० लाख रुपये जमा होतील, उर्वरित रक्कम नंतर जमा होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी एकूण १२२१ कोटी ४ लाख ८ हजार रुपयांचे मदत अनुदान बोंडअळीग्रस्त शेतक-यांना देण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिला हप्ता कोषागार कार्यालयाला प्राप्त झाला आहे.शेतकºयांना लागवडीयोग्य पिके, तंत्रज्ञान, औषधी फवारणी, पिकांसाठी घ्यावयाची काळजी, याबाबत जनजागृती करावी. शेतक-यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, अशा सूचना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय सहसचिव अश्विनी कुमार यांनी कृषी विभागाच्या अधिका-यांना केल्या.तालुक्यातील गाढेजळगाव, शेकटा, फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड आणि पाथरी येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी राज्य कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, सोमनाथ जाधव, तहसीलदार सतीश सोनी, संगीता चव्हाण, नंदिनी गोकटे, आर.डी. देशपांडे, के. डब्ल्यू. देशकर, चाहत सिंग, एम.जी. टेंभुर्णे, ए. मुरलीधरन, डॉ. डी.के. श्रीनिवासन, कृषी अधीक्षक संजीव पडवळ, कृषी विकास अधिकारी गंजेवार, कृषी सेवक, तालुका कृषी अधिका-यांची उपस्थिती होती.पथकाने शेतक-यांशी साधला संवादगाढेजळगाव येथे शेतकरी जाबेर सय्यद, उपसरपंच अब्दुल रहीम पठाण यांच्याशी संवाद साधून नुकसानीची केंद्रीय पथकाने ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा केली, तसेच तुकाराम मारोती ठोंबरे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. त्यानंतर शेकटा येथे दत्तात्रय जाधव, मनोज वाघ, युनूस भाई यांच्याशीही पथकाने कापूस लागवड, पेरा, बोंडअळी, वेचणी, उत्पादन, फवारणी याबाबत आलेल्या अडचणी याविषयी संवाद साधला, तसेच फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील हनुमान मंदिरात भीमराव भोपळे, उत्तम भोपळे, भास्कर डकले यांच्याशी कापूस पीक लागवड, पीकविमा याबाबत विचारपूस केली.

टॅग्स :cottonकापूसGovernmentसरकार