शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

आम आदमी विमा योजना नावालाच !

By admin | Updated: September 5, 2014 00:57 IST

नंदागौळ : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून २०११ पासून राज्यातील ग्रामीण भागातील भूमीहिन शेतमजूर किंंवा अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली.

नंदागौळ : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य विभागाकडून २०११ पासून राज्यातील ग्रामीण भागातील भूमीहिन शेतमजूर किंंवा अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली. यासाठीच वार्षिक हप्ता २०० रूपये आहे. ते राज्य शासन १०० व केंद्र शासन १०० रूपये भरते. तसेच या योजनेस पात्र असलेल्या व्यक्तींचे अर्ज संबंधीत गावच्या तलाठ्यामार्फत भरून घेण्यात येतात. जर कुटूंब प्रमुखाचा नैसर्गिक मृत्यू आला तर ३० हजार रूपये, अपघाती मृत्यू ७५ हजार रूपये व अवयव निकामी झाल्यास ३७,५०० व दोन्ही अवयव निकामी झाल्यास ७५ हजार रूपये विमा संरक्षण देण्यात येते. त्यानुसार मागील तीन वर्षांत परळी तालुक्यात १२,४२१ एवढे कुटूंब आम आदमी विमा योजनेस पात्र ठरविण्यात आलेले आहेत. पात्रधारकांची पाल्य जर ९ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना प्रतिमहिना १०० रूपये प्रमाणे १० महिन्यांचे १००० रूपये देण्यात येतात. २०११ ते २०२४ या वर्षात मिळून परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल केले, मात्र अद्यापपर्यंत एक रुपयाही विद्यार्थ्यांच्या हातावर पडलेला नाही. त्यामुळे परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शासनाकडे विमा कंपनी फंड असा एकूण ४४ लाख ८१ हजार रुपये एवढे येणे बाकी आहे. सर्वसामान्य विद्यार्र्थ्यांना शिष्यवृत्ती आलेली नसल्याने संबंधित विभागाबद्दल संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती का पोहोचली नाही? याचे उत्तर मात्र तहसीलदारालाही देता आले नाही. गटशिक्षणाधिकारी याबद्दल शांतच आहेत. शासनाकडून या शिष्यवृत्तीचा योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे ४४८१ विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित आहेत. संबंधित गावातील तलाठ्यांनी नाव नोंदणी करुन तहसीलदारांकडे अहवाल कळविणे आवश्यक असते, मात्र असा प्रकार तालुक्यात कोठेही नाही. याबाबत परळीचे तहसीलदार ए.टी. जटाळे म्हणाले, मागील तीन वर्षांतील आम आदमी शिष्यवृत्तीचे अर्ज विमा कंपनीकडे पाठविले आहेत. वंचित असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. (वार्ताहर)