शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

महाविद्यालयांना संलग्नता न देताच पाठविल्या समित्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 23:35 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी संलग्नता न दिलेल्या महाविद्यालयांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचा दावा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी केला.

ठळक मुद्दे विद्यापीठ : पाठविलेल्या समित्या मागतात मागील वर्षीचे संलग्नता प्रमाणपत्र

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या शेकडो महाविद्यालयांना मागील वर्षी पाठविलेल्या समित्यांच्या अहवालानंतर संलग्नता प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. तरीही या महाविद्यालयांमध्ये आगामी वर्षाची संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्यात आल्या आहेत. मागील वर्षी संलग्नता न दिलेल्या महाविद्यालयांची संख्या १०० पेक्षा अधिक असल्याचा दावा व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय निंबाळकर यांनी केला.विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयांतील सोयी- सुविधांची तपासणी करून संलग्नता देण्यासाठी समित्या पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. समित्यावर सदस्यांची निवड करताना मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत आहे. अपात्र लोकांनाही समित्यांवर पाठविण्यात आले आहे. व्यवस्थापन परिषदेने गुणवत्ता, दर्जा राखण्यासाठी ‘नॅक’ झालेल्या महाविद्यालयांतील प्राध्यापकांनाच समित्यांवर पाठविण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी झालेली नाही. याच वेळी मागील वर्षी संलग्नता समित्यांनी दिलेल्या अहवालानंतर संंबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेले नाही. यावर्षी समित्या गेल्यानंतर मागील वर्षाची संलग्नता मागतात. तेव्हा विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाशी संपर्क साधावा लागतो. तेथून संलग्नता प्रमाणपत्र घेण्यासाठीही आर्थिक देवाण-घेवाण करावी लागते. त्याशिवाय प्रस्तावच सापडत नाही, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका प्राचार्यांनी दिली. संलग्नता समित्या अहवाल देण्यासाठी पैशाची देवघेव करीत असतानाच अहवालानंतरही प्रमाणपत्रासाठी पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सोयी-सुविधा न पुरविणाऱ्या महाविद्यालयांवर कडक कारवाई करावी, त्यांची संलग्नता रद्द करण्याचीही कार्यवाही करावी, यासाठी समित्यांवर सक्षम लोकांना पाठविले पाहिजे, असेही संजय निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चौकटचतुर्थ श्रेणी कर्मचाºयाला बनविले समिती अध्यक्षऔरंगाबाद शहरातील एका प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या संलग्नता समितीवर त्याच संस्थेच्या माजलगाव येथील महाविद्यालयात चतुर्थ श्रेणीपदावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाºयाला समितीचे अध्यक्ष बनविण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर तात्काळ समितीचा अध्यक्ष बदलून देण्यात आल्याची माहिती एका व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.चौकटप्रश्नाला मार्क किती हेच समजत नाहीविद्यापीठ महाविद्यालयांमध्ये समित्या पाठविते. मात्र त्या समित्यांकडून पाहणी करण्यात येताना काही प्रश्नावली भरून घेण्यात येते. या प्रश्नांना १०० पैकी किती गुण दिले जातात हे समितीच्या सदस्यांसह संस्थाचालक, प्राचार्यांनाही माहीत नाही. त्या महाविद्यालयाला किती मार्क मिळाले हेसुद्धा कळविण्यात येत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.-------------

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयuniversityविद्यापीठ