शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

आयुक्त हटावच्या तलवारी म्यान

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत शासन दरबारी पाठविण्यासाठी शिवसेना-भाजपने कंबर कसली होती.

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत शासन दरबारी पाठविण्यासाठी शिवसेना-भाजपने कंबर कसली होती. युतीच्या नेत्यांनी अविश्वास ठरावाकडे न जाता विद्यमान आयुक्तांकडून व्यवस्थित काम करून घ्या, अशा कानपिचक्या देण्यात आल्या. त्यामुळे अविश्वास ठरावासाठी प्रयत्नशील असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या तलवारी म्यान केल्या. ‘एमआयएम’ पक्षात उघडपणे दोन गट पडले. या पक्षानेही अविश्वासाच्या मुद्यावर अगोदर युतीसोबत ‘विश्वास’ दाखविला आणि नंतर यू-टर्न घेतला.६ सप्टेंबर रोजी मनपाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. शहरातील खड्ड्यांसाठी आयोजित सभेत एमआयएमच्या एका नगरसेवकाने अधिकाऱ्यांना ‘गेंड्याची कातडी’ झाली आहे, असा वाक्यप्रचार केला. त्यामुळे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकाऱ्यांनी चक्क सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला. या घटनेमुळे मनपा पदाधिकारीही क्षणभर अवाक् झाले होते. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी अवमान केला. आयुक्तांनी माफी मागावी, उद्यापासून आयुक्तांना मनपात न येऊ देणे आदी मनसुबे पदाधिकाऱ्यांनी आखून ठेवले. सेनेचे दोन पदाधिकारी दुसऱ्याच दिवशी कोकणमध्ये पालकमंत्री रामदास कदम यांना भेटायला गेले. भाजपचे एक पदाधिकारी भोकरदनला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटायला गेले. युतीच्या दोन्ही नेत्यांनी अविश्वास ठराव नको, आहेत त्या आयुक्तांकडून काम करून घेण्याचा कानमंत्र दिला. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, एमआयएमच्या नगरसेवकाने सभागृहात तो शब्दप्रयोग केला होता. त्यांनाच मान-सन्मान नसेल तर युतीलाही काही देणे-घेणे नाही. आम्ही असा कोणताच ठराव यापुढे तरी आणणार नाही.भाजपची स्वतंत्र बैठकसोमवारी भाजपच्या कार्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभेचे सभापती तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांनी वॉर्डात विकासकामे होत नसल्याची तक्रार केली. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी तक्रारीच जास्त होत्या. उपस्थित नेत्यांनीही नगरसेवकांचे दु:ख ऐकून घेतले. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. त्यांच्या कानावर वस्तुस्थिती टाकण्यात येईल, असा सल्ला ज्येष्ठ नेत्यांनी दिला. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी सर्व नगरसेवकांना अविश्वास ठरावाच्या भानगडीत अजिबात पडू नका. विद्यमान आयुक्तांसोबत काम करा, असा ‘बुजुर्ग’पणाचा सल्ला दिला.