शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दिलासादायक ! ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये कोरोनाचे ५९ टक्के रुग्ण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:34 IST

सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराखाली कायम असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

ठळक मुद्दे१३ दिवसांत ८२५ कोरोना रुग्णांची वाढप्रशासन नव्या आव्हानाच्या तयारीत

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा जोर ओसरत असताना जिल्ह्याला ऑक्टोबरपेक्षाही नोव्हेंबरमध्ये अधिक दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबरमध्ये सुरुवातीच्या १३ दिवसांत १९८६ नव्या रुग्णांची वाढ झाली होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये याच कालावधीत ५९ टक्के कमी म्हणजे ८२५ रुग्ण आहेत.कोरोनाने सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात रौद्र रूप धारण केले होते. रोज ३०० ते ४०० च्या घरात रुग्णांचे निदान होत गेले. शहरासोबत ग्रामीण भागामध्येही रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत होती. 

या महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर प्रचंड ताण पडला. परिणामी, खाटा, आयसीयू खाटांसाठी रुग्णांना घेऊन एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयांत जाण्याची वेळ अनेक नातेवाईकांवर आली होती. बेड मिळण्यासाठी धावपळ अनेकांना करावी लागली; परंतु ऑक्टोबरमध्ये परिस्थिती निवळत गेली. हळूहळू स्थिती बदलली आणि रुग्णसंख्येत झपाट्याने घट झाली. या महिन्यात नव्या रुग्णांची भर पडण्याचे प्रमाण कमी झाले आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली. नोव्हेंबरमध्ये रुग्णसंख्येत आणखी घसरण सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दुहेरी संख्येतच रुगणांची वाढ होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराखाली कायम असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

प्रशासन नव्या आव्हानाच्या तयारीतदिवाळीत बाजारपेठेत खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीने प्रशासनाला घाम फोडला असून तज्ज्ञांनीही दुसऱ्या लाटेचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राज्य शासनानेही तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या. सध्या परिस्थिती दिलासादायक असली तरी प्रशासन नव्या आव्हानाच्या तयारीत लागल्याचे चित्र घाटी, जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांत दिसून येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद