शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू

By admin | Updated: January 18, 2015 00:28 IST

उस्मानाबाद : जिल्हा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेली ही जनजागरण दिंडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आहे.

उस्मानाबाद : जिल्हा शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेली ही जनजागरण दिंडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यात येतील. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाने तातडीने सोडविण्याची आवश्यकता असून, यासाठी प्रसंगी शासनाविरोधात रस्त्यावर उतरु , असा इशारा शिवसेना संपर्क प्रमुख विश्वनाथ नेरुरकर यांनी दिला.जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सुधिर पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शेतकरी आत्महत्या बचाव जनजागरण दिंडीचा प्रारंभ शनिवारी परंडा तालुक्यातील सोनारी येथून झाला. याप्रसंगी नेरुरकर बोलत होते. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये या संकटावर मात करण्याची उमेद निर्माण करण्यासाठी ही दिंडी असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, परंड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.ऋण काढून सण करण्याची आपल्याकडे पध्दत होती. पण आता मात्र ऋण काढून मरण ओढावण्याचे काम चालू आहे. निसर्गाच्या कोपामुळे आपण आर्थिक संकटात सापडलो आहोत. हे खरे असले तरी आत्महत्या करणे हा त्यावरील पर्याय नाही. संकटावर मात करुन आपण उभे राहिले पाहिजे असे ते म्हणाले. दिंडीच्या माध्यमातून शिवसैनिक, पदाधिकारी आपल्याकडून सर्व माहिती संकलीत करणार असून त्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना आखता येईल, याबाबत निश्चित धोरण ठरविले जाईल. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना हा अहवाल देवून त्यांच्या नेतृत्वाखालीलच मुख्यमंत्र्याची भेट घेण्यात येईल. असेही नेरुरकर यांनी सांगितले. शिवसेना जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यातील अर्धवट प्रकल्प पुर्ण करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे सांगत शेतकरी, शेतमजूर, निराधार आदींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्ता मोहिते, जिल्हा परिषद सदस्य दत्ता साळुंके, उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, बसवराज वरनाळे, जि. प. चे माजी सभापती धनंजय सावंत, श्रीकांत देशमुख, दिलीप शाळू महाराज, तालुकाप्रमुख दिलीप जावळे, मोहन पनुरे, प्रा. गौतम लटके, बाबुराव शहापुरे, आनंत भक्ते, पापा देशमुख, कमलाकर दाणे, बाळासाहेब देशमुख, मुजीब पठाण, विकास मोळवणे, विजय देशमुख, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)