शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

वैजापूर तालुक्यातील सिंचन प्रकल्प ‘कोमात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:23 IST

जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.यामुळे आगामी ३ ते ४ महिने तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. आता प्रशासन ऐनवेळेवर भविष्यातील पाणीटंचाईवर काय उपाय करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तालुक्यात मार्चच्या पंधरवड्यानंतरच उन्हाळ्याची चाहूल लागते. पुढे एप्रिल, मे अणि जून महिन्यांत ही धग कायम राहते. यंदा मात्र, ‘मे हिट’ तडाखा फेब्रुवारीतच नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्री गारवा तर दिवसा सूर्य आग ओकत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.तालुक्यातील दहा सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच तालुक्यात दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे.मात्र, असे असले तरी पंचायत समिती व जिल्हा प्रशासन याबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा अद्याप सज्ज झालेला नाही. नवीन विंधन विहिरी व कूपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पूर्वी पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावांत करायच्या असतात. मात्र, या उपाययोजनांबाबत अद्यापही कुठला निर्णय पं.स. स्तरावर झालेला नाही.त्यामुळे आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी, लागणार हे जवळपास निश्चित आहे.नारंगी प्रकल्पात२ टक्केच पाणीवैजापूर शहराला नारंगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या प्रकल्पात केवळ २ टक्के पाणी आहे.च्या प्रकल्पातून शहरासह बाजूच्या ७ ते ८ गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाते.च्त्यामुळे या प्रकल्पातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होऊन वैजापूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढऊ शकते.ढेकू तलावही तळालाच्ढेकू तलावाला शेतकºयांचे संरक्षित सिंचन म्हटले जाते. या तलावामुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी टिकून राहते. मात्र, यावर्षी या तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे.च्यामुळे गावखेड्यांतील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल, विहिरींची पातळीही घटली आहे.सिंचन प्रकल्पांची आजची स्थितीप्रकल्पाचे नावकोल्ही मध्यम प्रकल्पनारंगी मध्यम प्रकल्पबोरदहेगाव मध्यम प्रकल्पखंडाळा लघु प्रकल्पबिलवणी लघु प्रकल्पसटाणा लघु प्रकल्पगाढे पिंपळगाव लघु प्रकल्पजरुळ लघु प्रकल्पमन्याड साठवण तलाववांजरगाव बंधाराएकूण सरासरीक्षमता (दलघमी)३.२४११.५०११.४७०.४७२०.७६९१.१७१.६२९१.१६३.०१२.१५३६.५९आजचा साठा०.६८२जोता खालीजोता खाली०.०१७जोता खालीजोता खाली०.२२४कोरडे२.५२०.२२५३.६६८टक्केवारी२१.०४२.००---३.५६----१३.७४---८४.००१०.७११०.०३