शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वैजापूर तालुक्यातील सिंचन प्रकल्प ‘कोमात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:23 IST

जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : जवळपास दरवर्षी पाणीटंचाई वैजापूर तालुक्याच्या पाचवीला पुजली आहे. विशेष म्हणजे प्रशासन पाणीटंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा तालुक्यातील नागरिकांना आला आहे. आजघडीला तालुक्यातील १० सिंचन प्रकल्पांत केवळ १० टक्केच जलसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक स्थिती समोर आली आहे.यामुळे आगामी ३ ते ४ महिने तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. आता प्रशासन ऐनवेळेवर भविष्यातील पाणीटंचाईवर काय उपाय करते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तालुक्यात मार्चच्या पंधरवड्यानंतरच उन्हाळ्याची चाहूल लागते. पुढे एप्रिल, मे अणि जून महिन्यांत ही धग कायम राहते. यंदा मात्र, ‘मे हिट’ तडाखा फेब्रुवारीतच नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्री गारवा तर दिवसा सूर्य आग ओकत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे.तालुक्यातील दहा सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच तालुक्यात दुष्काळाचे संकट घोंगावू लागले आहे.मात्र, असे असले तरी पंचायत समिती व जिल्हा प्रशासन याबाबत अद्याप गंभीर झालेले दिसत नाही. पंचायत समितीचा पाणीटंचाई आराखडा अद्याप सज्ज झालेला नाही. नवीन विंधन विहिरी व कूपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, सिंचन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पूर्वी पूरक नळ योजना, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना गावागावांत करायच्या असतात. मात्र, या उपाययोजनांबाबत अद्यापही कुठला निर्णय पं.स. स्तरावर झालेला नाही.त्यामुळे आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी, लागणार हे जवळपास निश्चित आहे.नारंगी प्रकल्पात२ टक्केच पाणीवैजापूर शहराला नारंगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सध्या या प्रकल्पात केवळ २ टक्के पाणी आहे.च्या प्रकल्पातून शहरासह बाजूच्या ७ ते ८ गावांना सिंचनासाठी पाणी दिले जाते.च्त्यामुळे या प्रकल्पातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होऊन वैजापूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढऊ शकते.ढेकू तलावही तळालाच्ढेकू तलावाला शेतकºयांचे संरक्षित सिंचन म्हटले जाते. या तलावामुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी टिकून राहते. मात्र, यावर्षी या तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे.च्यामुळे गावखेड्यांतील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल, विहिरींची पातळीही घटली आहे.सिंचन प्रकल्पांची आजची स्थितीप्रकल्पाचे नावकोल्ही मध्यम प्रकल्पनारंगी मध्यम प्रकल्पबोरदहेगाव मध्यम प्रकल्पखंडाळा लघु प्रकल्पबिलवणी लघु प्रकल्पसटाणा लघु प्रकल्पगाढे पिंपळगाव लघु प्रकल्पजरुळ लघु प्रकल्पमन्याड साठवण तलाववांजरगाव बंधाराएकूण सरासरीक्षमता (दलघमी)३.२४११.५०११.४७०.४७२०.७६९१.१७१.६२९१.१६३.०१२.१५३६.५९आजचा साठा०.६८२जोता खालीजोता खाली०.०१७जोता खालीजोता खाली०.२२४कोरडे२.५२०.२२५३.६६८टक्केवारी२१.०४२.००---३.५६----१३.७४---८४.००१०.७११०.०३