शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय

By साहेबराव हिवराळे | Updated: March 21, 2024 18:28 IST

एक दिवस एक वसाहत: आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा, टँकर व जारच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

छत्रपती संभाजीनगर : अधिकारी, उद्योजक व सधन वसाहती मानल्या गेलेल्या सिडको एन-२, एन-३, एन-४ देखील समस्या मुक्त नाहीत. रस्ते गुळगुळीत दिसत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिका आठ दिवसातून एकदा पाणी देते अन् पाणीपट्टी एक महिन्याची वसूल करते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव टँकर व जारच्या पाण्यावर अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो आहे.

नियोजनाचा बोलबाला असलेल्या या वसाहतीमध्ये नियोजनाचा झालेला बभ्रा नागरिकांना गांजणाऱ्या समस्यावरून दिसतो. अनेक ठिकाणी ड्रेनेज व जलवाहिन्या एकमेकांना क्रॉस झाल्यात. दोन्हीपैकी कुठलीही वाहिनी लिकेज झाली की, नागरिकांना दूषित पाण्याचा रतीब टाकला जातो. गेल्या वर्षीपासून या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पण ते वेळेत काही पूर्ण होत नाही. या खोदकामातून निघालेला मुरूम चक्क येथून उचलून विकून टाकण्यात आला. हे खड्डे भरण्यासाठी माती आणून टाकली. आता ही माती दबून पुन्हा तेथे खड्डे झाले आहेत. ते कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या खड्ड्यातून सांडपाणी मुरून जलवाहिनीद्वारे नळास येते.

या वसाहतीत घंटागाडीची फेरीही दोन दिवसाआड होते. त्यामुळे दोन-तीन दिवस कचरा घरात साठवून ठेवावा लागतो. अनेकदा या कचऱ्यामुळे घरातही दुर्गंधी पसरते. हिरवाईने नटलेल्या या वसाहतीमध्ये झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात निघतो. त्यामुळे घंटागाड्यांनी या वसाहतीत दररोज फेरी मारून कचरा गोळावा करावा, अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे.

समान पाणी का वाटप नाही...नागरिक रांगेत उभे राहून कर मनपाकडे अदा करतात. मग सिडको एन-२ , ३, ४ परिसराला पुरेसे पाणी दिले जात नाही. ४५ मिनीट पाणीपुरवठा केला जातो. त्यात दूषित पाणी आले तर निर्जळीच होते.- राहुल इंगळे 

काळी माती आली कशी?मंदिराजवळून जलवाहिनी टाकण्यासाठी नवीनच सिमेंट रोड खोदण्यात आला. जलवाहिनी टाकली तीही ड्रेनेज लाइनला क्राॅस करून. येथील मुरूम गायब झाला व आता काळी माती टाकून बुजविणे सुरू आहे. कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.- मनोज बोरा

घंटा गाडी दररोज हवी...दररोज घरापर्यंत जाऊन कचरा उचलण्याची जबाबदारी दिलेली असताना दोन दिवसाआड घंटा गाडी पाठविली जाते. आमच्यावर जास्त लोड असल्याने दररोज येत नाही, असे सांगून कचरा गाडीवाले तिसऱ्या दिवशी फेरी मारतात. वर्गीकरण केलेल्या कचऱ्याच्या बकेट सांभाळून ठेवाव्या लागतात.- संध्या नारखेडे

जलबेल ॲप पारदर्शक नाही...३० मिनिटे अगोदर पाण्याचा संदेश पाठविला जातो तो संदेश आल्यापासून वाळूजला असलेला व्यक्ती धडपड करीत घरापर्यंत पोहोचतो. पाण्यासाठी एक व्यक्ती दिवसभर घरीच थांबवावा लागतो. कधी जलवाहिनी फुटली तर कधी पाणी पुरवठ्यास उशीर अशा प्रकाराने नागरिक वैतागले आहेत. - मयुरी व्यवहारे

रस्त्यावर अडथळे अधिक...मुलांना शाळेत जातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातून वाहने सुसाट चालविले जातात. यामुळे किरकोळ अपघात होतात. कामगार चौकात वाहतूक पोलिस कायम असावा म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही.- अर्चना पाटणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका