शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय

By साहेबराव हिवराळे | Updated: March 21, 2024 18:28 IST

एक दिवस एक वसाहत: आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा, टँकर व जारच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

छत्रपती संभाजीनगर : अधिकारी, उद्योजक व सधन वसाहती मानल्या गेलेल्या सिडको एन-२, एन-३, एन-४ देखील समस्या मुक्त नाहीत. रस्ते गुळगुळीत दिसत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिका आठ दिवसातून एकदा पाणी देते अन् पाणीपट्टी एक महिन्याची वसूल करते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव टँकर व जारच्या पाण्यावर अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो आहे.

नियोजनाचा बोलबाला असलेल्या या वसाहतीमध्ये नियोजनाचा झालेला बभ्रा नागरिकांना गांजणाऱ्या समस्यावरून दिसतो. अनेक ठिकाणी ड्रेनेज व जलवाहिन्या एकमेकांना क्रॉस झाल्यात. दोन्हीपैकी कुठलीही वाहिनी लिकेज झाली की, नागरिकांना दूषित पाण्याचा रतीब टाकला जातो. गेल्या वर्षीपासून या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पण ते वेळेत काही पूर्ण होत नाही. या खोदकामातून निघालेला मुरूम चक्क येथून उचलून विकून टाकण्यात आला. हे खड्डे भरण्यासाठी माती आणून टाकली. आता ही माती दबून पुन्हा तेथे खड्डे झाले आहेत. ते कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या खड्ड्यातून सांडपाणी मुरून जलवाहिनीद्वारे नळास येते.

या वसाहतीत घंटागाडीची फेरीही दोन दिवसाआड होते. त्यामुळे दोन-तीन दिवस कचरा घरात साठवून ठेवावा लागतो. अनेकदा या कचऱ्यामुळे घरातही दुर्गंधी पसरते. हिरवाईने नटलेल्या या वसाहतीमध्ये झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात निघतो. त्यामुळे घंटागाड्यांनी या वसाहतीत दररोज फेरी मारून कचरा गोळावा करावा, अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे.

समान पाणी का वाटप नाही...नागरिक रांगेत उभे राहून कर मनपाकडे अदा करतात. मग सिडको एन-२ , ३, ४ परिसराला पुरेसे पाणी दिले जात नाही. ४५ मिनीट पाणीपुरवठा केला जातो. त्यात दूषित पाणी आले तर निर्जळीच होते.- राहुल इंगळे 

काळी माती आली कशी?मंदिराजवळून जलवाहिनी टाकण्यासाठी नवीनच सिमेंट रोड खोदण्यात आला. जलवाहिनी टाकली तीही ड्रेनेज लाइनला क्राॅस करून. येथील मुरूम गायब झाला व आता काळी माती टाकून बुजविणे सुरू आहे. कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.- मनोज बोरा

घंटा गाडी दररोज हवी...दररोज घरापर्यंत जाऊन कचरा उचलण्याची जबाबदारी दिलेली असताना दोन दिवसाआड घंटा गाडी पाठविली जाते. आमच्यावर जास्त लोड असल्याने दररोज येत नाही, असे सांगून कचरा गाडीवाले तिसऱ्या दिवशी फेरी मारतात. वर्गीकरण केलेल्या कचऱ्याच्या बकेट सांभाळून ठेवाव्या लागतात.- संध्या नारखेडे

जलबेल ॲप पारदर्शक नाही...३० मिनिटे अगोदर पाण्याचा संदेश पाठविला जातो तो संदेश आल्यापासून वाळूजला असलेला व्यक्ती धडपड करीत घरापर्यंत पोहोचतो. पाण्यासाठी एक व्यक्ती दिवसभर घरीच थांबवावा लागतो. कधी जलवाहिनी फुटली तर कधी पाणी पुरवठ्यास उशीर अशा प्रकाराने नागरिक वैतागले आहेत. - मयुरी व्यवहारे

रस्त्यावर अडथळे अधिक...मुलांना शाळेत जातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातून वाहने सुसाट चालविले जातात. यामुळे किरकोळ अपघात होतात. कामगार चौकात वाहतूक पोलिस कायम असावा म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही.- अर्चना पाटणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका