शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पॉश म्हणवल्या जाणाऱ्या एन-२, एन-३, एन-४ या वसाहतींना समस्यांनी घेरलेय

By साहेबराव हिवराळे | Updated: March 21, 2024 18:28 IST

एक दिवस एक वसाहत: आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा, टँकर व जारच्या पाण्यावर भागवावी लागते तहान

छत्रपती संभाजीनगर : अधिकारी, उद्योजक व सधन वसाहती मानल्या गेलेल्या सिडको एन-२, एन-३, एन-४ देखील समस्या मुक्त नाहीत. रस्ते गुळगुळीत दिसत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. महापालिका आठ दिवसातून एकदा पाणी देते अन् पाणीपट्टी एक महिन्याची वसूल करते. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव टँकर व जारच्या पाण्यावर अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो आहे.

नियोजनाचा बोलबाला असलेल्या या वसाहतीमध्ये नियोजनाचा झालेला बभ्रा नागरिकांना गांजणाऱ्या समस्यावरून दिसतो. अनेक ठिकाणी ड्रेनेज व जलवाहिन्या एकमेकांना क्रॉस झाल्यात. दोन्हीपैकी कुठलीही वाहिनी लिकेज झाली की, नागरिकांना दूषित पाण्याचा रतीब टाकला जातो. गेल्या वर्षीपासून या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. पण ते वेळेत काही पूर्ण होत नाही. या खोदकामातून निघालेला मुरूम चक्क येथून उचलून विकून टाकण्यात आला. हे खड्डे भरण्यासाठी माती आणून टाकली. आता ही माती दबून पुन्हा तेथे खड्डे झाले आहेत. ते कोण भरणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या खड्ड्यातून सांडपाणी मुरून जलवाहिनीद्वारे नळास येते.

या वसाहतीत घंटागाडीची फेरीही दोन दिवसाआड होते. त्यामुळे दोन-तीन दिवस कचरा घरात साठवून ठेवावा लागतो. अनेकदा या कचऱ्यामुळे घरातही दुर्गंधी पसरते. हिरवाईने नटलेल्या या वसाहतीमध्ये झाडांचा पालापाचोळाही मोठ्या प्रमाणात निघतो. त्यामुळे घंटागाड्यांनी या वसाहतीत दररोज फेरी मारून कचरा गोळावा करावा, अशी मागणी महिला व नागरिकांकडून होत आहे.

समान पाणी का वाटप नाही...नागरिक रांगेत उभे राहून कर मनपाकडे अदा करतात. मग सिडको एन-२ , ३, ४ परिसराला पुरेसे पाणी दिले जात नाही. ४५ मिनीट पाणीपुरवठा केला जातो. त्यात दूषित पाणी आले तर निर्जळीच होते.- राहुल इंगळे 

काळी माती आली कशी?मंदिराजवळून जलवाहिनी टाकण्यासाठी नवीनच सिमेंट रोड खोदण्यात आला. जलवाहिनी टाकली तीही ड्रेनेज लाइनला क्राॅस करून. येथील मुरूम गायब झाला व आता काळी माती टाकून बुजविणे सुरू आहे. कामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.- मनोज बोरा

घंटा गाडी दररोज हवी...दररोज घरापर्यंत जाऊन कचरा उचलण्याची जबाबदारी दिलेली असताना दोन दिवसाआड घंटा गाडी पाठविली जाते. आमच्यावर जास्त लोड असल्याने दररोज येत नाही, असे सांगून कचरा गाडीवाले तिसऱ्या दिवशी फेरी मारतात. वर्गीकरण केलेल्या कचऱ्याच्या बकेट सांभाळून ठेवाव्या लागतात.- संध्या नारखेडे

जलबेल ॲप पारदर्शक नाही...३० मिनिटे अगोदर पाण्याचा संदेश पाठविला जातो तो संदेश आल्यापासून वाळूजला असलेला व्यक्ती धडपड करीत घरापर्यंत पोहोचतो. पाण्यासाठी एक व्यक्ती दिवसभर घरीच थांबवावा लागतो. कधी जलवाहिनी फुटली तर कधी पाणी पुरवठ्यास उशीर अशा प्रकाराने नागरिक वैतागले आहेत. - मयुरी व्यवहारे

रस्त्यावर अडथळे अधिक...मुलांना शाळेत जातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परिसरातून वाहने सुसाट चालविले जातात. यामुळे किरकोळ अपघात होतात. कामगार चौकात वाहतूक पोलिस कायम असावा म्हणजे वाहतूक कोंडी होणार नाही.- अर्चना पाटणी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका