शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज असली, तरी बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाय ...

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज असली, तरी बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाय अद्याप महाविद्यालयांकडे वळलेले नाहीत. दुसरीकडे, पदवीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून, अजून निकाल जाहीर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचीही पदवीसारखीच अवस्था आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात वाढलेल्या गुणांमुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा वाढणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता १ लाख ४१ हजार १२१ आहे, तर या विभागातील चार जिल्ह्यांमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थी १ लाख २९ हजार ३२२ आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असली, तरी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे, विद्यापीठातील विभागांमध्ये (मुख्य परिसर व उपपरिसर) पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता सुमारे २ हजार ४०० जागा आहे.

सध्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसली, तरी काही नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी सुरू केलेली आहे. बारावीच्या गुणपत्रिका व टीसी मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला गती येईल. दुसरीकडे, विद्यापीठामार्फत २९ जुलैपासून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांच्या परीक्षांना अजून प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा व निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागतील. सप्टेंबर अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात करण्याच्या तयारीत महाविद्यालये व विद्यापीठ आहे.

चौकट.......

आम्ही प्रवेशासाठी तयार आहोत

या संदर्भात देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल अर्दड यांनी सांगितले की, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज आहेत. ३ ऑगस्ट रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला, परंतु अजून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी प्रवेशाची लगबग सुरू झालेली नाही. स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बालाजी नागटिळक यांनी सांगितले की, गुणपत्रिका नसल्यामुळे सध्या प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची केवळ नोंदणी करून घेतली जात आहे.