शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज असली, तरी बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाय ...

औरंगाबाद : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज असली, तरी बारावीच्या गुणपत्रिका मिळाल्या नसल्यामुळे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे पाय अद्याप महाविद्यालयांकडे वळलेले नाहीत. दुसरीकडे, पदवीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून, अजून निकाल जाहीर होण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचीही पदवीसारखीच अवस्था आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा बारावीच्या निकालात वाढलेल्या गुणांमुळे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा वाढणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमासह व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता १ लाख ४१ हजार १२१ आहे, तर या विभागातील चार जिल्ह्यांमध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थी १ लाख २९ हजार ३२२ आहेत. प्रवेश क्षमतेपेक्षा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या कमी असली, तरी नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी यंदा ‘कट ऑफ’ वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरीकडे, विद्यापीठातील विभागांमध्ये (मुख्य परिसर व उपपरिसर) पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता सुमारे २ हजार ४०० जागा आहे.

सध्या प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नसली, तरी काही नामांकित महाविद्यालयांनी प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणी सुरू केलेली आहे. बारावीच्या गुणपत्रिका व टीसी मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रवेश प्रक्रियेला गती येईल. दुसरीकडे, विद्यापीठामार्फत २९ जुलैपासून पदवीच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा १७ ऑगस्टपासून सुरू होणार असून, विद्यापीठातील पदव्युत्तर विभागांच्या परीक्षांना अजून प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा व निकाल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लागतील. सप्टेंबर अखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करुन १ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात करण्याच्या तयारीत महाविद्यालये व विद्यापीठ आहे.

चौकट.......

आम्ही प्रवेशासाठी तयार आहोत

या संदर्भात देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल अर्दड यांनी सांगितले की, प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाविद्यालये सज्ज आहेत. ३ ऑगस्ट रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला, परंतु अजून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी प्रवेशाची लगबग सुरू झालेली नाही. स.भु. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बालाजी नागटिळक यांनी सांगितले की, गुणपत्रिका नसल्यामुळे सध्या प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची केवळ नोंदणी करून घेतली जात आहे.