शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
4
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
5
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
6
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
7
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
8
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
9
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
10
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
11
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
12
पावलं मंदावलीत पण उत्साह कायम! वयाची ऐंशी ओलांडलेल्या बहिणींना जग फिरण्याची भारीच हौस
13
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
14
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
15
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
16
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
17
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
18
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
19
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
20
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!

नारळ दारोदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2016 00:45 IST

औरंगाबाद : एरव्ही मंदिरांच्या बाहेर १५ ते २० रुपयांना मिळणारे नारळ सध्या दारोदारी १० रुपयात मिळत आहेत. ‘लो दस रुपयेमें नारल’ असे ओरडून हातगाडीवाले नारळ विक्री करीत आहेत.

औरंगाबाद : एरव्ही मंदिरांच्या बाहेर १५ ते २० रुपयांना मिळणारे नारळ सध्या दारोदारी १० रुपयात मिळत आहेत. ‘लो दस रुपयेमें नारल’ असे ओरडून हातगाडीवाले नारळ विक्री करीत आहेत. केवळ १० रुपयांना नारळ मिळत असल्याने हातोहात विक्री होत आहे. एरव्ही हातगाड्यांवर केळी, सफरचंद विक्री करणारे सध्या स्वस्त आणि मस्त नारळ विकून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. शहरात तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून नारळाची आवक होत आहे. या राज्यांत नारळाचे उत्पादन चांगले झाले आहे. मागील महिन्यात १ हजार रुपये शेकड्याने विक्री होणारे नारळ सध्या ७०० रुपयांत विक्री होत आहेत. हेच नारळ खरेदी करून हातगाडीवाले किरकोळमध्ये १० रुपये नगाने दारोदारी विकत आहेत. होलसेल विक्रेत्यांनी सांगितले की, हलक्या व भारी प्रतीचे नारळ बाजारात उपलब्ध झाले आहेत. बाजारात ७०० रुपयांपासून ते १६०० रुपयांपर्यंत प्रतिशेकडा नारळ विकत आहेत. त्यात तामिळनाडूतून आलेले नारळ नवीन व लहान आकारातील आहे. हे नारळ ८ दिवस टिकते. यानंतर ते खराब होऊन जाते. बाजारात आजही १३०० व १६०० रुपये प्रतिशेकडा नारळ उपलब्ध असून ते १५ ते २० रुपये प्रतिनगाने विकले जात आहेत. दर आठवड्याला मोंढ्यात एक ते दीड लाख नारळाची आवक होत आहे. आता श्रावण महिना सुरू होत असून या काळात नारळाची विक्री वाढणार आहे. किरकोळ विक्रेता शेख खलील याने सांगितले की, दोन आठवड्यांपूर्वी मी हातगाड्यांवर केळी विकत होतो. मात्र, नारळ ७ रुपयांत मिळू लागल्याने १० रुपयांत विकणे परवडत आहे. दररोज ८० ते १०० नारळ एका हातगाडीवर विकले जात आहेत. शहरात ६० ते ७० हातगाड्यांवर विक्री केली जात आहे.