शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख हेक्टर्सवरील पिकांवर कुळव

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून,

लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, त्यानंतर पावसाने ताण दिल्यामुळे पिके करपून गेली आहेत़ ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्सपैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली़ त्यातील २ लाख ५० हजार हेक्टर्सवर कुळव फिरवला आहे़ तसेच जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या ६ लाख १५० पशुधनाच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ उडीद, मुगाचा पेरा वाया गेला असून, २ लाख ५० हजार हेक्टर्सपैकी १ लाख ४७ हजार हेक्टर्सवरील सोयाबीन मोडीत निघाले आहे़ या पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे़ गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे़ दरम्यान, केंद्राचे दुष्काळी पथक लातुरात पाहणी करण्यासाठी आले असून, या पथकाला तीन-चार गावांचा शिवार पाहून दुष्काळाची दाहकता समजणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या पेरण्यांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ९८७ हेक्टर्सवर झाला आहे. मात्र गेल्या पाच आठवड्यांपासून पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र वगळता नंतर पाऊसच नाही. पावसाअभावी पिके करपली आहेत. चांगल्या जमिनीवरील पिकांनी तग धरली होती. परंतु, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ती पिकेही करपली आहेत. त्यामुळे पिके मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सोयाबीन-१ लाख ४७ हजार, तूर-४०३१, सूर्यफुल-२०००, मका-३८०, बाजरी-२०० आदी १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. लातूर तालुक्यात सोयाबीन १९०२, तूर २०१०, औसा तालुक्यात तूर ७००, सूर्यफुल ७००, मका ३८०, बाजारी २००, निलंगा तालुक्यात सोयाबीन ३०००, तूर ३२७, शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीन २२५०, रेणापूर तालुक्यात ३२५०, तूर ४५०, चाकूर तालुक्यात सोयाबीन ९५००, तूर २६६४ असे एकूण जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. यामुळे शेतकरी कोलमडला असून, त्याला शासनाच्या मदतीची गरज आहे़