शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

अडीच लाख हेक्टर्सवरील पिकांवर कुळव

By admin | Updated: August 12, 2015 01:00 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून,

लातूर : लातूर जिल्ह्यात ७ ते १७ जून या कालावधीत सरासरी ८३ मि.मी. पाऊस झाला़ या पावसावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली असून, त्यानंतर पावसाने ताण दिल्यामुळे पिके करपून गेली आहेत़ ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्सपैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली़ त्यातील २ लाख ५० हजार हेक्टर्सवर कुळव फिरवला आहे़ तसेच जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पही कोरडेठाक पडले आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या ६ लाख १५० पशुधनाच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ उडीद, मुगाचा पेरा वाया गेला असून, २ लाख ५० हजार हेक्टर्सपैकी १ लाख ४७ हजार हेक्टर्सवरील सोयाबीन मोडीत निघाले आहे़ या पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवला आहे़ गेल्या तीन वर्षांपासून ही स्थिती असल्याने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले आहे़ दरम्यान, केंद्राचे दुष्काळी पथक लातुरात पाहणी करण्यासाठी आले असून, या पथकाला तीन-चार गावांचा शिवार पाहून दुष्काळाची दाहकता समजणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे़लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या पेरण्यांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ९८७ हेक्टर्सवर झाला आहे. मात्र गेल्या पाच आठवड्यांपासून पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र वगळता नंतर पाऊसच नाही. पावसाअभावी पिके करपली आहेत. चांगल्या जमिनीवरील पिकांनी तग धरली होती. परंतु, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ती पिकेही करपली आहेत. त्यामुळे पिके मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये सोयाबीन-१ लाख ४७ हजार, तूर-४०३१, सूर्यफुल-२०००, मका-३८०, बाजरी-२०० आदी १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. लातूर तालुक्यात सोयाबीन १९०२, तूर २०१०, औसा तालुक्यात तूर ७००, सूर्यफुल ७००, मका ३८०, बाजारी २००, निलंगा तालुक्यात सोयाबीन ३०००, तूर ३२७, शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीन २२५०, रेणापूर तालुक्यात ३२५०, तूर ४५०, चाकूर तालुक्यात सोयाबीन ९५००, तूर २६६४ असे एकूण जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. यामुळे शेतकरी कोलमडला असून, त्याला शासनाच्या मदतीची गरज आहे़