शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांचे अपडाऊन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:44 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: दुष्काळामुळे जेथे नियुक्ती आहे त्या गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश

औरंगाबाद : जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशामुळे वरील कर्मचाºयांचे शहर ते गाव असे अपडाऊन बंद होणार आहे. जे कर्मचारी गावात मुक्कामी नसतील, गैरहजर आढळून येतील, त्यांच्या विरोधात विभागप्रमुखांनी तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाºयांनी आदेशात नमूद केले आहे.७ मे रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकाºयांनी म्हटले आहे, सद्य:स्थितीत जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, रोहयोची कामे देणे, जनावरांना चाºयाची सोय करणे आदी कामांना प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: प्रयत्न करीत आहे; परंतु ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये क्षेत्रीय स्तरावर अनेक ठिकाणी भेट दिली असता लोकप्रतिनिधींकडून काही तक्रारी आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक इतर कर्मचारी गावात उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या. ग्रामीण भागात नियुक्त असलेले सर्व कर्मचारी तेथे उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबावे. जनतेच्या अडचणी, कामे सोडविण्यास प्राधान्य द्यावे. जे कर्मचारी गावात मुक्कामी नसेल, गैरहजर असल्याचे आढळून येईल, त्यांच्या विरोधात तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपल्या अखत्यारीत ग्रामस्तरावरील कर्मचारी नियुक्ती मिळालेल्या ठिकाणी मुक्कामी आहेत की नाहीत, हे तपासावे.कन्नडमधील तलाठ्यावर कारवाईकन्नड तालुक्यातील तलाठी कोठावळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली. टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव लवकर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कर्मचाºयांची धावपळ सुरूजिल्ह्यात ४६३ सजा आहेत. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांची नियुक्ती आहे. बहुतांश कर्मचारी व तलाठी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत; परंतु जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे दुष्काळ संपेपर्यंत त्यांना गावात राहावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी भाड्याने खोली शोधण्यास सुरुवात केली आहे. आदेशामुळे कर्मचाºयांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हाधिकाºयांचे परिपत्रक जिल्ह्यातील पूर्ण विभागप्रमुखांना पाठविण्यात आले असून, त्यानुसार अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादdroughtदुष्काळ