शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांचे अपडाऊन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:44 IST

जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: दुष्काळामुळे जेथे नियुक्ती आहे त्या गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश

औरंगाबाद : जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशामुळे वरील कर्मचाºयांचे शहर ते गाव असे अपडाऊन बंद होणार आहे. जे कर्मचारी गावात मुक्कामी नसतील, गैरहजर आढळून येतील, त्यांच्या विरोधात विभागप्रमुखांनी तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाºयांनी आदेशात नमूद केले आहे.७ मे रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकाºयांनी म्हटले आहे, सद्य:स्थितीत जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, रोहयोची कामे देणे, जनावरांना चाºयाची सोय करणे आदी कामांना प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: प्रयत्न करीत आहे; परंतु ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये क्षेत्रीय स्तरावर अनेक ठिकाणी भेट दिली असता लोकप्रतिनिधींकडून काही तक्रारी आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक इतर कर्मचारी गावात उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या. ग्रामीण भागात नियुक्त असलेले सर्व कर्मचारी तेथे उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबावे. जनतेच्या अडचणी, कामे सोडविण्यास प्राधान्य द्यावे. जे कर्मचारी गावात मुक्कामी नसेल, गैरहजर असल्याचे आढळून येईल, त्यांच्या विरोधात तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपल्या अखत्यारीत ग्रामस्तरावरील कर्मचारी नियुक्ती मिळालेल्या ठिकाणी मुक्कामी आहेत की नाहीत, हे तपासावे.कन्नडमधील तलाठ्यावर कारवाईकन्नड तालुक्यातील तलाठी कोठावळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली. टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव लवकर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कर्मचाºयांची धावपळ सुरूजिल्ह्यात ४६३ सजा आहेत. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांची नियुक्ती आहे. बहुतांश कर्मचारी व तलाठी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत; परंतु जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे दुष्काळ संपेपर्यंत त्यांना गावात राहावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी भाड्याने खोली शोधण्यास सुरुवात केली आहे. आदेशामुळे कर्मचाºयांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हाधिकाºयांचे परिपत्रक जिल्ह्यातील पूर्ण विभागप्रमुखांना पाठविण्यात आले असून, त्यानुसार अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादdroughtदुष्काळ