शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

बंद योजनांनी टाकली टंचाईत भर

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत अजूनही २७० नळ योजना अपूर्ण आहेत़ सध्या टंचाईची स्थिती निर्माण झाली असून

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत अजूनही २७० नळ योजना अपूर्ण आहेत़ सध्या टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, या योजना वेळेत कार्यान्वित झाल्या असत्या तर समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाली असती़ दुुष्काळी स्थितीने जिल्हा ग्रासला असताना दुसरीकडे नियोजनाच्या अभावामुळे देखील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा, ग्रामस्थांची पाण्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने ग्रामीण पाणीपुरवठा योजना काम करते़ भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना उभारल्या जातात़ या योजना उभारल्यानंतर त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्या जातात़ जिल्ह्यात भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४०२ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या़ त्यापैकी केवळ १३२ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून, २७० योजना अपूर्ण आहेत़ ग्रामीण भागात अनेक गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे़ परंतु, नियोजनाचा अभाव असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईसारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़ सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ जलस्त्रोत आटू लागले आहेत़ प्रमुख बंधारे, तलाव, विहिरी आणि हातपंपांचे पाणी तळ गाठू लागले आहे़ त्यामुळे पाणीटंचार्इंचा प्रश्न उग्र बनत चालला आहे़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना राबविण्यात आल्या़ परभणी तालुक्यात ७१ योजनांना मंजुरी मिळाली़ त्यापैकी केवळ २८ योजना पूर्ण झाल्या आहेत़ पूर्णा तालुक्यात ४८ योजनांपैकी १५, गंगाखेड तालुक्यात ५५ पैकी २०, जिंतूर तालुक्यात ५३ पैकी ६, पाथरी तालुक्यात २४ पैकी १४, सेलू तालुक्यात ४४ पैकी २४, पालम तालुक्यात ६२ पैकी ९, मानवत तालुक्यात २२ पैकी ९ आणि सोनपेठ तालुक्यात २३ पैकी केवळ ७ योजना पूर्णत्वाला गेल्या आहेत़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे उद्दिष्टय पूर्ण करण्यामध्ये सेलू तालुका आघाडीवर असल्याचे दिसते़ या तालुक्यासाठी ४४ योजना मंजूर झाल्या होत्या़ यापैकी २४ योजना पूर्ण झाल्या आहेत़ तर पालम, जिंतूर या तालुक्यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात मोठी अनास्था असल्याचे दिसते़ पालम तालुक्यात ६२ पैकी ९ तर जिंतूर तालुक्यात ५३ पैकी केवळ ६ योजना पूर्णत्वाला गेल्या आहेत़ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती स्पष्ट होते़ (प्रतिनिधी)जिल्ह्यामध्ये ४०२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती़ त्यापैकी केवळ १३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ परंतु, अनेक योजनांची कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत़ परभणी तालुक्यामध्ये ४३ योजनांची कामे होणे बाकी आहेत़ पूर्ण तालुक्यात ३३, गंगाखेड तालुक्यात ३५, जिंतूर तालुक्यात ४७, पाथरी १०, सेलू २०, पालम ५३, मानवत १३ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १६ पाणीपुरवठा योजनांची कामे अजूनही अपूर्ण आहेत़ ही कामे वेळेत पूर्ण झाली असती तर पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच मदत झाली असती़