लातूर : महापुरुषांच्या फेबसबुकवरील विटंबनाप्रकरणी जिल्ह्यात निलंगा, उदगीर व किल्लारीत बाजारपेठ ठेऊन ठिकठिकाणी सदरील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला़ निलंगा : महापुरुषांच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना केल्याप्रकरणी विविध संघटनांच्या वतीने निलंगा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली़ तसेच रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अंकुश ढेरे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ यामध्ये महापुरुषाची विटंबना करणाऱ्या माथेफिरूस फाशीची शिक्षा द्यावी, फेसबुक वापरावरच बंदी घालावी, अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, आदी मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले़ निवेदनावर मनसेचे डॉ़ नरसिंह भिकाणे, रामलिंग पटसाळगे, मेघराज जेवळीकर, दिगंबर सूर्यवंशी, अमोल कांबळे, धम्मानंद कांबळे, भरत सूर्यवंशी, संदीप कांबळे, लहू ढेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़ उदगीर : रिपाइं तालुका शाखेच्या वतीने महापुरुषांच्या फेसबुकवरील विटंबनेच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली़ यावेळी अॅड़ प्रफुल्लकुमार उदगीरकर, सुशीलकुमार शिंदे, राहुल कांबळे, अमोल श्रृंगारे, अतुल घोडके, नितीन गायकवाड, अविनाश गायकवाड, प्रदीप महापुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़ (प्रतिनिधी)किल्लारीतही बंद़़़ महापुरुांच्या फेसबुकवरील विटंबनेच्या निषेधार्थ औसा तालुक्यातील किल्लारी येथे भिम सेनेतर्फे किल्लारी मार्केट बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला़ यावेळी सुनील कांबळे, बिभिषण कांबळे, राहूल कांबळे, गणेश कांबळे, प्रदीप कांबळे, बाबासाहेब कांबळे, सुभाष गायकवाड, दयानंद गायकवाड, बाबासाहेब सितापूरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी परिश्रम घेतले़ त्यामुळे किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़‘त्या’ प्रकरणाचा लातुरात निषेधलातूर : महापुरूषांची छायाचित्रे फेसबुक व सोशल मीडियावर अपलोड करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे़ महापुरूषांची बदनामी करण्याचा हा प्रकार घृणास्पद असून याचा जाहीर निषेध सामाजिक संघटनांकडून करण्यात आला आहे़ सामाजिक सलोखा कायम राखून गुन्हेगारास कडक शासन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे़ जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने सामाजिक संघटनांची एकत्रित बैठक घेऊन याप्रकरणाचा निषेध करण्यात आला़ सामाजिक सलोखा राखण्यात लातूरची आदर्श परंपरा आहे़ याला तडा जाऊ नये़ राज्यात धार्मिक स्थळांचे पावित्र्य जाणीवपूर्वक नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ महापुरूषांची जाणीवपूर्वक बदनामी करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ पुणे येथे एका तरूणांचा नाहक बळी गेला आहे़ जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सर्वांनी हाणून पाडला पाहिजे़ गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, परंतु जातीच्या नावाने तेढ करण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी जमीयत उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष हाफीज अब्दुल जब्बार, सचिव मौलाना ईस्माईल कास्मी, इक्रम शेख, मराठा सेवा संघाचे विजयकुमार औंढे, भारत मुक्ती मोर्चाचे मारूती माने, प्रा़ भिसे, बामसेफचे चंद्रकांत वानखेडे, मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष कलीम पटेल, एमआयएमचे बरकत काझी, ओ़बी़सी़चे जिल्हाध्यक्ष अफजल कुरेशी, साबेर काजी, डॉ़ नवीद खान, पठाण उपस्थित होते़(प्रतिनिधी)
जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद
By admin | Updated: June 10, 2014 00:53 IST