शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

८०० हून अधिक महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:02 IST

कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देप्रशासन विरोधात संघटना : मतमोजणीतील कर्मचारी कार्यरत राहणार

औरंगाबाद : कन्नड उपविभागीय कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि वाहनचालकावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने दुष्काळात कामबंद आंदोलन सुरूच ठेवले असून, सोमवारी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग नोंदविला.गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील. दुष्काळी उपाययोजना वगळता कोणत्याच कामांत महसूल कर्मचाºयांचा सहभाग राहणार नाही. शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून, मागणी पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहणार असल्याचे तलाठी संघटनेचे राज्य सरचिटणीस अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले. तसेच मतमोजणीच्या कामावर या कामबंद आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही. इलेक्शन ड्यूटीवर सर्व कर्मचारी कार्यरत राहतील, असेही सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.सोमवारी २० मे रोजी सकाळी सर्व संघटनांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यासोबत संघटनांची चर्चा झाली नाही. निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्यासोबत संघटनेने चर्चा केली. मात्र त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संघटनेने कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. सकारात्मक तोडगा निघाला नाहीतर विभागीय आयुक्तांना भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.अप्पर जिल्हाधिकारी चौकशी करणारमंडळ अधिकारी, वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला म्हणजे ते आरोपी होत नाहीत. कन्नड उपविभागीय कार्यालयातील प्रकरणात नेमके काय घडले आहे, याची अप्पर जिल्हाधिकाºयांकडून चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी १७ मे रोजी स्पष्ट केले होते. परंतु किती कालावधीत चौकशी पूर्ण होणार हे स्पष्ट केले नाही. जिल्हाधिकाºयांनी संघटनेशी तोंडी चर्चा केली आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन आणि मंडळ अधिकारी, वाहनचालकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गिरगे, सरचिटणीस अरविंद धोंगडे यांनी सांगितले.कामबंद आंदोलनाचा परिणामकामबंद आंदोलनाचा प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला आहे. दुष्काळाचे कामकाज वगळता उर्वरित विभाग कर्मचाºयांविना ओस पडले होते. प्रशासनाने मात्र, सर्व कामकाज सुरळीत असल्याचा दावा केला. तलाठी, मंडळ अधिकारी, लिपिक, अव्वल कारकून, वाहनचालकांसह महसूल कर्मचारी संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांचा कामबंद आंदोलनात समावेश आहे. चिकलठाणा तलाठी विशाल मगरे, मंडळ अधिकारी अप्पासाहेब गोरडे यांनी सांगितले, दुष्काळ नियोजन वगळता इतर महसुली विभागातील कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत.नेमके प्रकरण काय आहेबापू रिंढे याने गुरुवारी कन्नड उपविभागीय कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आत्महत्येस मंडळ अधिकारी बी. एन. गवळी, वाहनचालक सुनील चिंधुटे जबाबदार असल्याचे कारण पुढे करीत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. रिंढे यांच्या गळफासाला महसूल कर्मचारी जबाबदार नाहीत. त्याच्या नातेवाईकाच्या तोंडी मागणीवरून हा गुन्हा दाखल केला गेला. पोलीस निरीक्षकांना प्रकरण हाताळता आले नाही, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी संघटनेची मागणी आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस यांच्यातील अंतर्गत वादामुळे हा सगळा प्रकार घडल्याची चर्चा आहे.------------

टॅग्स :Aurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादStrikeसंप