शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
3
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
4
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
6
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
7
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
8
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
9
ओवेसींच्या पाठिंब्यामुळे प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत मारली बाजी, कोण आहेत काँग्रेसचे आमदार नवीन यादव?
10
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
11
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
13
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
14
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
15
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
16
Yuvraj Singh Father Yograj Singh : "मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
17
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
18
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
19
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
20
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभावर चढले, पुतळे जाळले अन अंगावर रॉकेल ओतून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करीत ...

औरंगाबाद: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे २५ ते ३० कार्यकर्ते गुरूवारी दुपारी अचानक शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढले. पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत त्यांनी दानवे यांचे दोन पुतळे जाळले. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले, परंतु अन्य कार्यकर्त्यांनी त्याला रोखले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची जोरदार घोषणाबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी धाव घेतली. आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी ते जलकुंभावरुन चढू लागले. मात्र आंदोलक आक्रमक झाल्याने त्यांना तेथून परतावे लागले. आंदोलकापैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते तर काही जण तेथे पडलेले प्लास्टीक कुलरचे खोके आणि लाकडी बॉक्स जाळून लक्ष वेधून घेत होते. आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड, यांच्यासह सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

==================

चौकट

काय आहेत मागण्या - शेतकरीविरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करा.

-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.

============

चौकट

पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची शिष्टाई असफल

पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी शिवाजीनगर येथे धाव घेतली. त्यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही.

=============

जलकुंभावर जेवण आणि झोपण्यासाठी कंबळ

जलकुंभावर चढून दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन मागण्या मान्य न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आंदोलकांनी जलकुंभावर पिण्याच्या पाण्याचे जार नेले. रात्री ९:३० वाजता ९ ते १० आंदोलक खाली उतरले आणि उर्वरित आंदोलकांसाठी जेवण घेऊन गेले. थंडीचा त्रास होऊ नये याकरिता आंदोलकांना कंबळ देण्यात आल्या.

========

पोलिसांसमोर पुतळे नेऊन जलकुंभावर जाळले

खाली असलेल्या आंदोलकांना पकडले तर जलकुंभावरील आंदोलक टोकाचे पाऊल उचलतील, अशी पोलिसांना भीती होती. पोलिसांसमोर आंदोलकांनी दानवे यांचे दोन पुतळे जलकुंभावर नेले. पोलिसांनी त्यांना अडविले नाही. जलकुंभावर पुतळे नेऊन जोरदार घोषणा देत जाळले.

==========

जलकुंभाखाली पोलिसांचा खडा पहारा

विनंती करुनही आंदोलक जलकुंभावरुन खाली उतरत नसल्यामुळे शेवटी पोलिसांनी जलकुंभाखाली राहुटी लावून तेथे खडा पहारा सुरू ठेवला.