शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

जलकुंभावर चढले, पुतळे जाळले अन अंगावर रॉकेल ओतून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करीत ...

औरंगाबाद: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे २५ ते ३० कार्यकर्ते गुरूवारी दुपारी अचानक शिवाजीनगर येथील जलकुंभावर चढले. पोलीस आणि जनतेचे लक्ष वेधून घेत त्यांनी दानवे यांचे दोन पुतळे जाळले. एका कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेतले, परंतु अन्य कार्यकर्त्यांनी त्याला रोखले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची जोरदार घोषणाबाजी रात्री उशिरापर्यंत सुरूच होती.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी १२ वाजेपासून शिवाजीनगर जलकुंभावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी धाव घेतली. आंदोलकाशी चर्चा करण्यासाठी ते जलकुंभावरुन चढू लागले. मात्र आंदोलक आक्रमक झाल्याने त्यांना तेथून परतावे लागले. आंदोलकापैकी काही जण कपडे काढून घोषणा देत होते तर काही जण तेथे पडलेले प्लास्टीक कुलरचे खोके आणि लाकडी बॉक्स जाळून लक्ष वेधून घेत होते. आंदोलनात सुधाकर शिंदे, बाळू भोसले, अमोल ढगे, दीपक चिकटे, राम गाडेकर, मंगेश साबळे, सुदाम गायकवाड, यांच्यासह सुमारे २५ ते ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

==================

चौकट

काय आहेत मागण्या - शेतकरीविरोधी काळे कायदे तात्काळ रद्द करा.

-दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाविषयी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी.

============

चौकट

पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची शिष्टाई असफल

पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहाय्यक आयुक्त निशीकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी शिवाजीनगर येथे धाव घेतली. त्यांनी आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन केले. मात्र आंदोलकांनी त्यांचे ऐकले नाही.

=============

जलकुंभावर जेवण आणि झोपण्यासाठी कंबळ

जलकुंभावर चढून दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन मागण्या मान्य न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आंदोलकांनी जलकुंभावर पिण्याच्या पाण्याचे जार नेले. रात्री ९:३० वाजता ९ ते १० आंदोलक खाली उतरले आणि उर्वरित आंदोलकांसाठी जेवण घेऊन गेले. थंडीचा त्रास होऊ नये याकरिता आंदोलकांना कंबळ देण्यात आल्या.

========

पोलिसांसमोर पुतळे नेऊन जलकुंभावर जाळले

खाली असलेल्या आंदोलकांना पकडले तर जलकुंभावरील आंदोलक टोकाचे पाऊल उचलतील, अशी पोलिसांना भीती होती. पोलिसांसमोर आंदोलकांनी दानवे यांचे दोन पुतळे जलकुंभावर नेले. पोलिसांनी त्यांना अडविले नाही. जलकुंभावर पुतळे नेऊन जोरदार घोषणा देत जाळले.

==========

जलकुंभाखाली पोलिसांचा खडा पहारा

विनंती करुनही आंदोलक जलकुंभावरुन खाली उतरत नसल्यामुळे शेवटी पोलिसांनी जलकुंभाखाली राहुटी लावून तेथे खडा पहारा सुरू ठेवला.